शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वणवण; २२ गावांची तहान विहीर अधिग्रहणावर

By जितेंद्र दखने | Updated: March 28, 2023 18:07 IST

पाणीटंचाई : सहा विंधन, १६ खासगी विहिरींवर मदार

अमरावती : यंदा अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये नांदगाव खंडेश्वर आणि मोर्शी या दोन तालुक्यातीलच १० तर उर्वरित ७ तालुक्यातील १२ गावांचा यात समावेश आहे. या गावातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यामधून २२ गावांत विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ६ विंधन विहीर आणि १६ खासगी विहिरींद्वारे तहान भागविली जात आहे. याशिवाय मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे एप्रिल व त्यानंतरच्या मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा सुमारे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा समाधानकारक झाला असला तरी पाण्याच्या साठवणुकीत प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, असे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा चिखलदरा तालुक्यासोबत अन्य तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे बोलले जात असले तरी टंचाईची तीव्रता पाहता यंत्रणेकडून केला जात असलेल्या उपाययोजना केव्हा फायदेशीर ठरणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चिखलदरा तालुक्यातील १५ गावांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज स्थितीत आकी या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अमरावती, तिवसा, वरूड,चांदूर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, भातकुली, या ९ तालुक्यांमधील २२ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून त्या गावातील विंधन विहीर व खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

या आहेत उपाययोजना

नवीन विंधन विहिरी,नवीन हातपंप,खासगी विहिरींचे अधिग्रहण,नळयोजनाची विशेष दुरुस्ती, विहिरींचे व तलावांचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.पाच तालुक्यात नाही टंचाई

जिल्ह्यातील धारणी, अंजनगाव सुजी, धामणगांव रेल्वे, चांदूर बाजार, दयार्पूर १४ पैकी या ५ तालुक्याचा टंचाईचा अपवाद सोडला तर उर्वरित ९ तालुक्यातील २२ गावात पाणीटंचाई भेडसावत असल्याने विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ४,नांदगाव खंडेश्वर ६,भातकुली १, तिवसा १, मोर्शी ४, वरूड १, चांदूर रेल्वे १, अचलपूर २, चिखलदरा २ अशाप्रकारे २२ गावांचा यात समावेश आहे.

पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखड्यानुसार कामांचे नियोजन केले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विंधन व खासगी विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. तसेच प्रस्तावित सर्व उपाययोजना करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातMelghatमेळघाटAmravatiअमरावती