शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वणवण; २२ गावांची तहान विहीर अधिग्रहणावर

By जितेंद्र दखने | Updated: March 28, 2023 18:07 IST

पाणीटंचाई : सहा विंधन, १६ खासगी विहिरींवर मदार

अमरावती : यंदा अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये नांदगाव खंडेश्वर आणि मोर्शी या दोन तालुक्यातीलच १० तर उर्वरित ७ तालुक्यातील १२ गावांचा यात समावेश आहे. या गावातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यामधून २२ गावांत विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ६ विंधन विहीर आणि १६ खासगी विहिरींद्वारे तहान भागविली जात आहे. याशिवाय मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे एप्रिल व त्यानंतरच्या मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा सुमारे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा समाधानकारक झाला असला तरी पाण्याच्या साठवणुकीत प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, असे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा चिखलदरा तालुक्यासोबत अन्य तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे बोलले जात असले तरी टंचाईची तीव्रता पाहता यंत्रणेकडून केला जात असलेल्या उपाययोजना केव्हा फायदेशीर ठरणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चिखलदरा तालुक्यातील १५ गावांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज स्थितीत आकी या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अमरावती, तिवसा, वरूड,चांदूर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, भातकुली, या ९ तालुक्यांमधील २२ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून त्या गावातील विंधन विहीर व खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

या आहेत उपाययोजना

नवीन विंधन विहिरी,नवीन हातपंप,खासगी विहिरींचे अधिग्रहण,नळयोजनाची विशेष दुरुस्ती, विहिरींचे व तलावांचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.पाच तालुक्यात नाही टंचाई

जिल्ह्यातील धारणी, अंजनगाव सुजी, धामणगांव रेल्वे, चांदूर बाजार, दयार्पूर १४ पैकी या ५ तालुक्याचा टंचाईचा अपवाद सोडला तर उर्वरित ९ तालुक्यातील २२ गावात पाणीटंचाई भेडसावत असल्याने विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ४,नांदगाव खंडेश्वर ६,भातकुली १, तिवसा १, मोर्शी ४, वरूड १, चांदूर रेल्वे १, अचलपूर २, चिखलदरा २ अशाप्रकारे २२ गावांचा यात समावेश आहे.

पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखड्यानुसार कामांचे नियोजन केले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विंधन व खासगी विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. तसेच प्रस्तावित सर्व उपाययोजना करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातMelghatमेळघाटAmravatiअमरावती