शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

पाण्यासाठी वणवण; २२ गावांची तहान विहीर अधिग्रहणावर

By जितेंद्र दखने | Updated: March 28, 2023 18:07 IST

पाणीटंचाई : सहा विंधन, १६ खासगी विहिरींवर मदार

अमरावती : यंदा अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये नांदगाव खंडेश्वर आणि मोर्शी या दोन तालुक्यातीलच १० तर उर्वरित ७ तालुक्यातील १२ गावांचा यात समावेश आहे. या गावातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यामधून २२ गावांत विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ६ विंधन विहीर आणि १६ खासगी विहिरींद्वारे तहान भागविली जात आहे. याशिवाय मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे एप्रिल व त्यानंतरच्या मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा सुमारे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा समाधानकारक झाला असला तरी पाण्याच्या साठवणुकीत प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, असे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा चिखलदरा तालुक्यासोबत अन्य तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे बोलले जात असले तरी टंचाईची तीव्रता पाहता यंत्रणेकडून केला जात असलेल्या उपाययोजना केव्हा फायदेशीर ठरणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चिखलदरा तालुक्यातील १५ गावांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज स्थितीत आकी या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अमरावती, तिवसा, वरूड,चांदूर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, भातकुली, या ९ तालुक्यांमधील २२ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून त्या गावातील विंधन विहीर व खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

या आहेत उपाययोजना

नवीन विंधन विहिरी,नवीन हातपंप,खासगी विहिरींचे अधिग्रहण,नळयोजनाची विशेष दुरुस्ती, विहिरींचे व तलावांचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.पाच तालुक्यात नाही टंचाई

जिल्ह्यातील धारणी, अंजनगाव सुजी, धामणगांव रेल्वे, चांदूर बाजार, दयार्पूर १४ पैकी या ५ तालुक्याचा टंचाईचा अपवाद सोडला तर उर्वरित ९ तालुक्यातील २२ गावात पाणीटंचाई भेडसावत असल्याने विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ४,नांदगाव खंडेश्वर ६,भातकुली १, तिवसा १, मोर्शी ४, वरूड १, चांदूर रेल्वे १, अचलपूर २, चिखलदरा २ अशाप्रकारे २२ गावांचा यात समावेश आहे.

पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखड्यानुसार कामांचे नियोजन केले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विंधन व खासगी विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. तसेच प्रस्तावित सर्व उपाययोजना करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातMelghatमेळघाटAmravatiअमरावती