शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

पाण्यासाठी वणवण; २२ गावांची तहान विहीर अधिग्रहणावर

By जितेंद्र दखने | Updated: March 28, 2023 18:07 IST

पाणीटंचाई : सहा विंधन, १६ खासगी विहिरींवर मदार

अमरावती : यंदा अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यामध्ये नांदगाव खंडेश्वर आणि मोर्शी या दोन तालुक्यातीलच १० तर उर्वरित ७ तालुक्यातील १२ गावांचा यात समावेश आहे. या गावातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यामधून २२ गावांत विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ६ विंधन विहीर आणि १६ खासगी विहिरींद्वारे तहान भागविली जात आहे. याशिवाय मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे एप्रिल व त्यानंतरच्या मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा सुमारे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा समाधानकारक झाला असला तरी पाण्याच्या साठवणुकीत प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, असे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा चिखलदरा तालुक्यासोबत अन्य तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे बोलले जात असले तरी टंचाईची तीव्रता पाहता यंत्रणेकडून केला जात असलेल्या उपाययोजना केव्हा फायदेशीर ठरणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चिखलदरा तालुक्यातील १५ गावांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज स्थितीत आकी या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अमरावती, तिवसा, वरूड,चांदूर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, भातकुली, या ९ तालुक्यांमधील २२ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून त्या गावातील विंधन विहीर व खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

या आहेत उपाययोजना

नवीन विंधन विहिरी,नवीन हातपंप,खासगी विहिरींचे अधिग्रहण,नळयोजनाची विशेष दुरुस्ती, विहिरींचे व तलावांचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.पाच तालुक्यात नाही टंचाई

जिल्ह्यातील धारणी, अंजनगाव सुजी, धामणगांव रेल्वे, चांदूर बाजार, दयार्पूर १४ पैकी या ५ तालुक्याचा टंचाईचा अपवाद सोडला तर उर्वरित ९ तालुक्यातील २२ गावात पाणीटंचाई भेडसावत असल्याने विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ४,नांदगाव खंडेश्वर ६,भातकुली १, तिवसा १, मोर्शी ४, वरूड १, चांदूर रेल्वे १, अचलपूर २, चिखलदरा २ अशाप्रकारे २२ गावांचा यात समावेश आहे.

पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखड्यानुसार कामांचे नियोजन केले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विंधन व खासगी विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. तसेच प्रस्तावित सर्व उपाययोजना करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातMelghatमेळघाटAmravatiअमरावती