शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

अचलपूर-परतवाड्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:01 IST

जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.

ठळक मुद्देनळाची धार बारीक । गळतीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर - परतवाडा शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यात नळाची धार बारीक असून काही भागात नळातून पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.अचलपूर नगर पालिकेकडून जुळ्या शहराला चंद्रभागात धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान जुळ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला लिकिजेसमुळे ठिकठिकाणी गळती लागली आहे. मात्र, नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कारण पुढे करीत लिकिजेस, गळती थांबवायला नगरपालिका तयार नाही.जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शहरांतर्गत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरही लिकिजेस आहेत. हे पाईप तुटल्याने शहरात सर्वत्र पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.दूषित पाणीपुरवठाअथक प्रयत्नानंतर नागरिकांना दोन चार बकेटा पाणी मिळते, तेही दूषित आहे. पाईप लाईनला गटारात लिकेजेस आहेत. त्यामुळे नाल्यातील, गटारातील, दूषित पाणी त्या पाईप लाईनमध्ये शिरून ते नागरिकांना नळाद्वारे मिळत आहे. चंद्रभागेच्या पाण्यासोबतच जवळपास १६ ट्यूबवेलचे थेट पाणी पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमधून सोडले जात आहे. या ट्युबवेलमधील पाण्यावर शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. दूषित पाणी शहरवासीयांना पुरविले जात आहे.अतिरिक्त पाण्याची उचलचंद्रभागा धरणातून पाणी घेताना ज्या मीटरद्वारे अचलपूर नगरपरिषद पाणी घेते ते मीटर अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याची दुरुस्ती अद्याप नगरपरिषदेने केलेली नाही. बंद मीटर बदलविले नाही. नेमक्या या बंद मीटरचा फायदा घेत नगरपालिकेने त्या धरणातून मंजूर पाण्यापेक्षा अतिरिक्त पाण्याची उचल केली आहे. ही बाब पाटबंधारे विभागाने नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिली असून, मीटर दुरुस्तीबाबत नगररिषदेला पत्रही दिले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाने या घटनेला गांभीर्याने घेतल्यास भविष्यात शहरातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई