शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

अचलपूर-परतवाड्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:01 IST

जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.

ठळक मुद्देनळाची धार बारीक । गळतीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर - परतवाडा शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यात नळाची धार बारीक असून काही भागात नळातून पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.अचलपूर नगर पालिकेकडून जुळ्या शहराला चंद्रभागात धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान जुळ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला लिकिजेसमुळे ठिकठिकाणी गळती लागली आहे. मात्र, नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कारण पुढे करीत लिकिजेस, गळती थांबवायला नगरपालिका तयार नाही.जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शहरांतर्गत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरही लिकिजेस आहेत. हे पाईप तुटल्याने शहरात सर्वत्र पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.दूषित पाणीपुरवठाअथक प्रयत्नानंतर नागरिकांना दोन चार बकेटा पाणी मिळते, तेही दूषित आहे. पाईप लाईनला गटारात लिकेजेस आहेत. त्यामुळे नाल्यातील, गटारातील, दूषित पाणी त्या पाईप लाईनमध्ये शिरून ते नागरिकांना नळाद्वारे मिळत आहे. चंद्रभागेच्या पाण्यासोबतच जवळपास १६ ट्यूबवेलचे थेट पाणी पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमधून सोडले जात आहे. या ट्युबवेलमधील पाण्यावर शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. दूषित पाणी शहरवासीयांना पुरविले जात आहे.अतिरिक्त पाण्याची उचलचंद्रभागा धरणातून पाणी घेताना ज्या मीटरद्वारे अचलपूर नगरपरिषद पाणी घेते ते मीटर अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याची दुरुस्ती अद्याप नगरपरिषदेने केलेली नाही. बंद मीटर बदलविले नाही. नेमक्या या बंद मीटरचा फायदा घेत नगरपालिकेने त्या धरणातून मंजूर पाण्यापेक्षा अतिरिक्त पाण्याची उचल केली आहे. ही बाब पाटबंधारे विभागाने नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिली असून, मीटर दुरुस्तीबाबत नगररिषदेला पत्रही दिले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाने या घटनेला गांभीर्याने घेतल्यास भविष्यात शहरातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई