शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

आदिवासी व्हायचेय! 'इबितवार' खोडून 'चौधरी' तर 'तेलंग' ऐवजी 'राजगोंड'

By गणेश वासनिक | Published: October 17, 2023 3:46 PM

आडनाव अन् जात बदलून केली 'राजगोंड' जमातीत घुसखोरी, किनवट कास्ट व्हॅलिडिटी समितीने शाेधून काढला प्रकार

अमरावती : आदिवासी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळेच्या दाखल खारिज मधील आपले आडनाव 'इबितवार' खोडून 'चौधरी' केले तर जातीच्या रकान्यात नोंद असलेले 'तेलंग' खोडून 'राजगोंड' केले आहे. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होनाळी या गावात घडला. हा प्रकार किनवट अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने शोधून काढला आहे. बालाजी गणपतराव चौधरी बनावट जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांचे नाव आहे.

'राजगोंड' जमातीतील एकाच कुटुंबातील वडील, मुलगा, मुलगी या तिघांचे जातप्रमाणपत्र नुकतेच किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने रद्द केले आहे. यात तिघांत वडील नेताजी माणिकराव चौधरी आहे. त्यांचे चुलत काका बालाजी गणपतराव चौधरी हे आहेत. त्यांच्या दाखल खारिज रजिस्टरवरील अनुक्रमांक ३१५ असा आहे. तर खुद्द नेताजी चौधरी यांनी जातीच्या रकान्यातील 'तेलंग' खोडून 'राजगोंड' केले.

ही नोंद ४३२ क्रमांकावर आहेत. होनाळी शाळेत रक्तनात्यातील व गावातील सात शालेय विद्यार्थ्यांच्या जातीच्या रकान्यात खाडाखोड करण्यात आली आहे. दाखल खारिज रजिस्टर मधील अनुक्रमांक ३१२, ५८८, ४९६, ४९९, ५०१, ६०२, ६०६ मध्ये चक्क 'तेलंग' जात खोडून 'राजगोंड' अशी नोंद करून जात बदलण्यात आली आहे. शालेय अभिलेखातील जातीच्या नोंदीचा बदल हा माध्यमिक शाळा संहितेतील नियम २६.४ मधील विहीत तरतुदी अन्वये करण्यात आलेला नाही.

आडनावे आणि वंशावळी दिशाभूल करणारी

नेताजी माणिकराव चौधरी यांनी समितीसमोर चौधरी, इंद्राळे, कारभारी, तेलंग, बच्चेवार, इबितवार, मुक्रामवार, निलंगा, काटेवार,कोयलवार, बत्तीणवार अशी समाजबांधवांची 'राजगोंड' जमातीची आडनावे सादर केली आहेत. परंतु ही आडनावे राजगोंड जमातीत येत नाही. वंशावळ सुद्धा फसवणूक करणारी सादर करण्यात आली. यात जातवैधता धारक विजय मारोती चौधरी (नस्ती क्र.एलएटी/एसईआर/१४६/१९९९) यांचे जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात आले. परंतु विजय यांचे वडिलांचे नाव मारोती काशिराम चौधरी व आजोबाचे नाव काशिराम हुशेनी तेलंग असे आहे. नेताजीच्या वंशावळीत असलेल्या विजय यांचे वडिलांचे नाव मारोती तुळशिराम चौधरी व आजोबाचे नाव तुळशीराम संतराम असे नमूद आहे.

आडनाव आणि जात बदलवून आदिवासी समाजातील 'राजगोंड' जमातीचा लाभ उठवणे हा गंभीर प्रकार आहे. या संदर्भात सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल.

- डॉ. संदीप धुर्वे आमदार, तथा राज्याध्यक्ष अ.भा.गोंड आदिवासी संघ महाराष्ट्र.

संविधानाने आदिवासी समाजाला सात टक्के आरक्षण दिले आहे. त्यातील जवळपास चार टक्के आरक्षण राज्यातील नामसदृष्य असलेल्या ३३ जातींनी लुटले आहे. केवळ तीन टक्केच आरक्षण ख-या आदिवासी समाजाला मिळाले आहे. लुटलेल्या चार टक्के आरक्षणाची भरपाई कोण करणार?

- ॲड. प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रGovernmentसरकारfraudधोकेबाजी