शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

‘वंदे मातरम्’चा जयघोष, ६०० फुटांचा तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचे फलक महारॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच चौकांमध्ये लागले आहेत.

ठळक मुद्देसीएए, एनआरसीला पाठिंबा : दीडशेपेक्षा अधिक संघटनांचा सहभाग, शहरात मुख्य मार्गाने फिरली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरात लोकाधिकार मंचद्वारे महारॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो नागरिक तिरंगा व भगवे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या रॅलीला दीडशेवर संघटनांनी पाठिंबा दिला. रॅलीदरम्यान ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहराचा प्रत्येक चौक दुमदुमला. गगनभेदी घोषणा देत नागरिकांनी विधेयकाला पाठिंबा व्यक्त केला.शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचे फलक महारॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच चौकांमध्ये लागले आहेत. रॅलीतदेखील ‘मोदी...मोदी...’ असा घोष करण्यात आला. याशिवाय ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’, ‘भारत के सम्मान में, हम सब मैदान में’ आदी नारेदेखील आसमंतात गुंजले. तिरंगा हातात घेण्यासाठी अनेक युवकांची धडपड दिसून आली. देशभक्तीपर नारे, तिरंगा आदींमुळे रॅलीत राष्ट्रीय उत्सवासारखे वातावरण वाटत होते.रॅलीत ६०० फूट लांबीचा तिरंगा युवकांनी डोक्यावर धरला. या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. नेहरू मैदानातून निघालेली रॅली राजकमल चौक, श्याम चौक, सरोज चौक, मालवीय चौक, इर्वीन चौक, रेल्वे स्टेशन मार्गे पुन्हा नेहरू मैदानात दाखल झाली. येथे या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या महारॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष, आरएसएस, भाजयुमो, महिला आघाडी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह दीडशेवर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.रॅलीचे संयोजक बंटी पारवाणी, सहसंयोजक बादल कुळकर्णी, सुधीर बोपुलकर, नीलेश मारोडकर, सुरेखा लुंगारे आदी होते. रॅलीसाठी शहरात नियोजनबद्धपणे संवाद, प्रचार प्रसारासह सहभागाचे आवाहन करण्यात येत होते. भारतात राहणाऱ्या कुणाही नागरिकाला सीएए व एनआरसी कायद्यापासून धोका नाही, हे पटवून देण्यासोबत राष्ट्रहितासाठी या कायद्यांना पाठबळ मिळावे, असे आवाहन आयोजकांनी यादरम्यान केले. शहरातील प्रमुख मार्गाची वाहतूक तासभर खोळंबली होती. स्वत: सीपी संजय बावीस्कर यांनी निर्देश देऊन वाहतूक सुरळीत केली.उद्रेकाला विरोधक जबाबदार-हंसराज अहीरनागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशामध्ये सध्या जो उद्रक होत आहे, त्यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी रॅलीच्या समारोपाप्रसंगी जाहीर सभेत केला. यावेळी चंद्रशेखर भोंदू, हरीश हरकर, महापौर चेतन गावंडे, मोहनदादा अमृते, संतोष नवलानी, श्यामबाबा निचित, ज्ञानेश्वर रणपीसे, सचिन अंबाडकर, ज्ञानेश्वर खूपसे, आमदार अरुण अडसड, प्रवीण पोटे, माजी आमदार सुनील देशमुख, जगदीश गुप्ता, अनिल बोंडे, रमेश बुंदीले, अनिल साहू, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर,निवेदिता चौधरी, बाळासाहेब भुयार, तुषार भारतीय, अजय सारस्कर, रमेश मावस्कर, विवेक कलोती, अनिल आसलकर, रीता मोकलकर यांसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.दुपारपर्यंत बाजारपेठ बंदमहारॅलीच्या समर्थनार्थ काही व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला व दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक व्यापारीदेखील या रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. दुपारी १ नंतर दुकाने उघडायला सुरुवात झाली. या रॅलीसाठी चौकाचौकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नागरिकांनी नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. नागरिक उत्साहात असले तरी पूर्वनियोजनानुसार ही महारॅली अगदी शांतपणे पार पडली.भारतमातेची प्रतिमा अग्रस्थानीराष्ट्रसमर्थन महारॅलीच्या अग्रस्थानी एका ट्रॅक्टरवर भारतमातेची प्रतिमा मांडली होती. रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग होता. रॅलीच्या संयोजकांनी गेल्या चार दिवसांपासून शहरातील नागरिक, व्यापारी सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना यांच्याशी नियोजनबद्धपणे संवाद साधल्याने या महारॅलीमध्ये समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व दिसून आले. अनेक गटांनी ‘सीएए’ला समर्थन देत असताना स्वत:चे गटाचे अस्तित्व घोषणा, नारे अन् फलकांनी दाखवून दिले.