शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

‘वंदे मातरम्’चा जयघोष, ६०० फुटांचा तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचे फलक महारॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच चौकांमध्ये लागले आहेत.

ठळक मुद्देसीएए, एनआरसीला पाठिंबा : दीडशेपेक्षा अधिक संघटनांचा सहभाग, शहरात मुख्य मार्गाने फिरली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरात लोकाधिकार मंचद्वारे महारॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो नागरिक तिरंगा व भगवे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या रॅलीला दीडशेवर संघटनांनी पाठिंबा दिला. रॅलीदरम्यान ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहराचा प्रत्येक चौक दुमदुमला. गगनभेदी घोषणा देत नागरिकांनी विधेयकाला पाठिंबा व्यक्त केला.शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचे फलक महारॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच चौकांमध्ये लागले आहेत. रॅलीतदेखील ‘मोदी...मोदी...’ असा घोष करण्यात आला. याशिवाय ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’, ‘भारत के सम्मान में, हम सब मैदान में’ आदी नारेदेखील आसमंतात गुंजले. तिरंगा हातात घेण्यासाठी अनेक युवकांची धडपड दिसून आली. देशभक्तीपर नारे, तिरंगा आदींमुळे रॅलीत राष्ट्रीय उत्सवासारखे वातावरण वाटत होते.रॅलीत ६०० फूट लांबीचा तिरंगा युवकांनी डोक्यावर धरला. या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. नेहरू मैदानातून निघालेली रॅली राजकमल चौक, श्याम चौक, सरोज चौक, मालवीय चौक, इर्वीन चौक, रेल्वे स्टेशन मार्गे पुन्हा नेहरू मैदानात दाखल झाली. येथे या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या महारॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष, आरएसएस, भाजयुमो, महिला आघाडी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह दीडशेवर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.रॅलीचे संयोजक बंटी पारवाणी, सहसंयोजक बादल कुळकर्णी, सुधीर बोपुलकर, नीलेश मारोडकर, सुरेखा लुंगारे आदी होते. रॅलीसाठी शहरात नियोजनबद्धपणे संवाद, प्रचार प्रसारासह सहभागाचे आवाहन करण्यात येत होते. भारतात राहणाऱ्या कुणाही नागरिकाला सीएए व एनआरसी कायद्यापासून धोका नाही, हे पटवून देण्यासोबत राष्ट्रहितासाठी या कायद्यांना पाठबळ मिळावे, असे आवाहन आयोजकांनी यादरम्यान केले. शहरातील प्रमुख मार्गाची वाहतूक तासभर खोळंबली होती. स्वत: सीपी संजय बावीस्कर यांनी निर्देश देऊन वाहतूक सुरळीत केली.उद्रेकाला विरोधक जबाबदार-हंसराज अहीरनागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशामध्ये सध्या जो उद्रक होत आहे, त्यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी रॅलीच्या समारोपाप्रसंगी जाहीर सभेत केला. यावेळी चंद्रशेखर भोंदू, हरीश हरकर, महापौर चेतन गावंडे, मोहनदादा अमृते, संतोष नवलानी, श्यामबाबा निचित, ज्ञानेश्वर रणपीसे, सचिन अंबाडकर, ज्ञानेश्वर खूपसे, आमदार अरुण अडसड, प्रवीण पोटे, माजी आमदार सुनील देशमुख, जगदीश गुप्ता, अनिल बोंडे, रमेश बुंदीले, अनिल साहू, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर,निवेदिता चौधरी, बाळासाहेब भुयार, तुषार भारतीय, अजय सारस्कर, रमेश मावस्कर, विवेक कलोती, अनिल आसलकर, रीता मोकलकर यांसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.दुपारपर्यंत बाजारपेठ बंदमहारॅलीच्या समर्थनार्थ काही व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला व दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक व्यापारीदेखील या रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. दुपारी १ नंतर दुकाने उघडायला सुरुवात झाली. या रॅलीसाठी चौकाचौकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नागरिकांनी नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. नागरिक उत्साहात असले तरी पूर्वनियोजनानुसार ही महारॅली अगदी शांतपणे पार पडली.भारतमातेची प्रतिमा अग्रस्थानीराष्ट्रसमर्थन महारॅलीच्या अग्रस्थानी एका ट्रॅक्टरवर भारतमातेची प्रतिमा मांडली होती. रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग होता. रॅलीच्या संयोजकांनी गेल्या चार दिवसांपासून शहरातील नागरिक, व्यापारी सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना यांच्याशी नियोजनबद्धपणे संवाद साधल्याने या महारॅलीमध्ये समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व दिसून आले. अनेक गटांनी ‘सीएए’ला समर्थन देत असताना स्वत:चे गटाचे अस्तित्व घोषणा, नारे अन् फलकांनी दाखवून दिले.