शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

‘वंदे मातरम्’चा जयघोष, ६०० फुटांचा तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचे फलक महारॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच चौकांमध्ये लागले आहेत.

ठळक मुद्देसीएए, एनआरसीला पाठिंबा : दीडशेपेक्षा अधिक संघटनांचा सहभाग, शहरात मुख्य मार्गाने फिरली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरात लोकाधिकार मंचद्वारे महारॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो नागरिक तिरंगा व भगवे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या रॅलीला दीडशेवर संघटनांनी पाठिंबा दिला. रॅलीदरम्यान ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहराचा प्रत्येक चौक दुमदुमला. गगनभेदी घोषणा देत नागरिकांनी विधेयकाला पाठिंबा व्यक्त केला.शहरातील नेहरू मैदानातून सकाळी ११ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. यामध्ये हातात तिरंगा व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन सर्वच वयोगटातील हजारो नागरिक या महारॅलीत उस्फूर्तपणे सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याबाबत त्यांच्या अभिनंदनाचे फलक महारॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच चौकांमध्ये लागले आहेत. रॅलीतदेखील ‘मोदी...मोदी...’ असा घोष करण्यात आला. याशिवाय ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’, ‘भारत के सम्मान में, हम सब मैदान में’ आदी नारेदेखील आसमंतात गुंजले. तिरंगा हातात घेण्यासाठी अनेक युवकांची धडपड दिसून आली. देशभक्तीपर नारे, तिरंगा आदींमुळे रॅलीत राष्ट्रीय उत्सवासारखे वातावरण वाटत होते.रॅलीत ६०० फूट लांबीचा तिरंगा युवकांनी डोक्यावर धरला. या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. नेहरू मैदानातून निघालेली रॅली राजकमल चौक, श्याम चौक, सरोज चौक, मालवीय चौक, इर्वीन चौक, रेल्वे स्टेशन मार्गे पुन्हा नेहरू मैदानात दाखल झाली. येथे या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या महारॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष, आरएसएस, भाजयुमो, महिला आघाडी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह दीडशेवर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.रॅलीचे संयोजक बंटी पारवाणी, सहसंयोजक बादल कुळकर्णी, सुधीर बोपुलकर, नीलेश मारोडकर, सुरेखा लुंगारे आदी होते. रॅलीसाठी शहरात नियोजनबद्धपणे संवाद, प्रचार प्रसारासह सहभागाचे आवाहन करण्यात येत होते. भारतात राहणाऱ्या कुणाही नागरिकाला सीएए व एनआरसी कायद्यापासून धोका नाही, हे पटवून देण्यासोबत राष्ट्रहितासाठी या कायद्यांना पाठबळ मिळावे, असे आवाहन आयोजकांनी यादरम्यान केले. शहरातील प्रमुख मार्गाची वाहतूक तासभर खोळंबली होती. स्वत: सीपी संजय बावीस्कर यांनी निर्देश देऊन वाहतूक सुरळीत केली.उद्रेकाला विरोधक जबाबदार-हंसराज अहीरनागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशामध्ये सध्या जो उद्रक होत आहे, त्यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी रॅलीच्या समारोपाप्रसंगी जाहीर सभेत केला. यावेळी चंद्रशेखर भोंदू, हरीश हरकर, महापौर चेतन गावंडे, मोहनदादा अमृते, संतोष नवलानी, श्यामबाबा निचित, ज्ञानेश्वर रणपीसे, सचिन अंबाडकर, ज्ञानेश्वर खूपसे, आमदार अरुण अडसड, प्रवीण पोटे, माजी आमदार सुनील देशमुख, जगदीश गुप्ता, अनिल बोंडे, रमेश बुंदीले, अनिल साहू, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर,निवेदिता चौधरी, बाळासाहेब भुयार, तुषार भारतीय, अजय सारस्कर, रमेश मावस्कर, विवेक कलोती, अनिल आसलकर, रीता मोकलकर यांसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.दुपारपर्यंत बाजारपेठ बंदमहारॅलीच्या समर्थनार्थ काही व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिला व दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक व्यापारीदेखील या रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. दुपारी १ नंतर दुकाने उघडायला सुरुवात झाली. या रॅलीसाठी चौकाचौकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. नागरिकांनी नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. नागरिक उत्साहात असले तरी पूर्वनियोजनानुसार ही महारॅली अगदी शांतपणे पार पडली.भारतमातेची प्रतिमा अग्रस्थानीराष्ट्रसमर्थन महारॅलीच्या अग्रस्थानी एका ट्रॅक्टरवर भारतमातेची प्रतिमा मांडली होती. रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग होता. रॅलीच्या संयोजकांनी गेल्या चार दिवसांपासून शहरातील नागरिक, व्यापारी सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना यांच्याशी नियोजनबद्धपणे संवाद साधल्याने या महारॅलीमध्ये समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व दिसून आले. अनेक गटांनी ‘सीएए’ला समर्थन देत असताना स्वत:चे गटाचे अस्तित्व घोषणा, नारे अन् फलकांनी दाखवून दिले.