शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात मुद्रांक शुल्क माफ; तरीही ३९ कोटींच्या स्टँम्पचा वापर

By गणेश वासनिक | Updated: June 22, 2024 14:38 IST

नायब तहसीलदारांकडून शंभर रुपयांच्या मुद्रांकाची सक्ती, विद्यार्थ्यांसह पालकांची आर्थिक फसवणूक

अमरावती : जातप्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालय यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८, अनुसूची एकमधील अनुच्छेद चार अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. मात्र अद्यापही सर्रासपणे मुद्रांकांचा वापर केला जात असून, आतापर्यंत ३९ कोटींच्या स्टॅम्पचा वापर झाल्याचे वास्तव समाेर आले आहे.

महसूल व वनविभागाने १ जुलै २००४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचना जारी केलेली आहे. याशिवाय १२ मे २०१५ रोजी शासन परिपत्रकही जारी केले आहे. तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई यांनीही २१ सप्टेंबर २०१५ रोजी परिपत्रक जारी केले आहे. परंतु या आदेशाचे बऱ्याच शासकीय कार्यालयांमधून व अधिकाऱ्यांकडून पालन होताना दिसत नाही. सामान्य नागरिक व विद्यार्थी शासकीय कार्यालयात जेव्हा प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी जातात तेव्हा अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र स्टॅम्पपेपरवर करून आणण्याचा आग्रह धरला जातो.

जातपडताळणीकरीता विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत आवश्यक असते. त्याकरिता शाळांकडून सर्रासपणे स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र मागितले जात आहे. जातपडताळणी कार्यालयात वंशावळी, आजोबा शिक्षित नसेल तर इत्यादी कारणासाठी स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.निवडणुकीसाठीही स्टँम्प पेपर माफ

राज्य निवडणूक आयोगाने ८ जानेवारी २०१५ रोजी निवडणुकीत प्रतिज्ञापत्र व घोषणापत्रासाठी स्टँम्प पेपरचा आग्रह धरला जाणार नाही. असा आदेश जारी केलेला आहे. तरीही निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही निवडणूक लढविणा-या उमेदवारांना स्टँम्प पेपरवरचं प्रतिज्ञापत्र आणि घोषणापत्र सादर करण्याचा आग्रह धरला जातो.

३९ कोटींच्या स्टँम्प पेपरचा वापर

राज्य शासनाने २००४ मध्ये मुद्रांक शुल्क माफ केल्यानंतरही राज्यातील विविध शासकीय कार्यालयात आवश्यकता नसताना देखील १०० रुपयाच्या स्टँम्पची सक्ती केल्यामुळे २०२१ पर्यंत राज्यभरात १०० रुपयांचे तब्बल ३९ कोटी ६ लाख ७८ हजार रुपयांचे स्टँम्प पेपर वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.विद्यार्थ्यांसाठी मुद्रांकांवर प्रतीज्ञापत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. जात पडताळणीत स्वतंत्रपणे दोन प्रतीज्ञापत्र द्यावे लागतात.मात्र ते देखील नोंदणीकृत पत्रावर आवश्यक असते. परंतु, काही नायब तहसीलदार हे मुद्रांकांशिवाय प्रतीज्ञापत्र देत नाही अशी उदाहरणे समाेर आली आहे. तथापि शासनाने मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.- सुनील वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण अमरावती.