शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शासकीय कार्यालयात मुद्रांक शुल्क माफ; तरीही ३९ कोटींच्या स्टँम्पचा वापर

By गणेश वासनिक | Updated: June 22, 2024 14:38 IST

नायब तहसीलदारांकडून शंभर रुपयांच्या मुद्रांकाची सक्ती, विद्यार्थ्यांसह पालकांची आर्थिक फसवणूक

अमरावती : जातप्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालय यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८, अनुसूची एकमधील अनुच्छेद चार अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. मात्र अद्यापही सर्रासपणे मुद्रांकांचा वापर केला जात असून, आतापर्यंत ३९ कोटींच्या स्टॅम्पचा वापर झाल्याचे वास्तव समाेर आले आहे.

महसूल व वनविभागाने १ जुलै २००४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचना जारी केलेली आहे. याशिवाय १२ मे २०१५ रोजी शासन परिपत्रकही जारी केले आहे. तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई यांनीही २१ सप्टेंबर २०१५ रोजी परिपत्रक जारी केले आहे. परंतु या आदेशाचे बऱ्याच शासकीय कार्यालयांमधून व अधिकाऱ्यांकडून पालन होताना दिसत नाही. सामान्य नागरिक व विद्यार्थी शासकीय कार्यालयात जेव्हा प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी जातात तेव्हा अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र स्टॅम्पपेपरवर करून आणण्याचा आग्रह धरला जातो.

जातपडताळणीकरीता विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत आवश्यक असते. त्याकरिता शाळांकडून सर्रासपणे स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र मागितले जात आहे. जातपडताळणी कार्यालयात वंशावळी, आजोबा शिक्षित नसेल तर इत्यादी कारणासाठी स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.निवडणुकीसाठीही स्टँम्प पेपर माफ

राज्य निवडणूक आयोगाने ८ जानेवारी २०१५ रोजी निवडणुकीत प्रतिज्ञापत्र व घोषणापत्रासाठी स्टँम्प पेपरचा आग्रह धरला जाणार नाही. असा आदेश जारी केलेला आहे. तरीही निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही निवडणूक लढविणा-या उमेदवारांना स्टँम्प पेपरवरचं प्रतिज्ञापत्र आणि घोषणापत्र सादर करण्याचा आग्रह धरला जातो.

३९ कोटींच्या स्टँम्प पेपरचा वापर

राज्य शासनाने २००४ मध्ये मुद्रांक शुल्क माफ केल्यानंतरही राज्यातील विविध शासकीय कार्यालयात आवश्यकता नसताना देखील १०० रुपयाच्या स्टँम्पची सक्ती केल्यामुळे २०२१ पर्यंत राज्यभरात १०० रुपयांचे तब्बल ३९ कोटी ६ लाख ७८ हजार रुपयांचे स्टँम्प पेपर वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.विद्यार्थ्यांसाठी मुद्रांकांवर प्रतीज्ञापत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. जात पडताळणीत स्वतंत्रपणे दोन प्रतीज्ञापत्र द्यावे लागतात.मात्र ते देखील नोंदणीकृत पत्रावर आवश्यक असते. परंतु, काही नायब तहसीलदार हे मुद्रांकांशिवाय प्रतीज्ञापत्र देत नाही अशी उदाहरणे समाेर आली आहे. तथापि शासनाने मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.- सुनील वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण अमरावती.