शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

वऱ्हाडातील ४६ तालुक्यात पावसाची तूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 18:01 IST

शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे.

अमरावती - शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे. पश्चिम विदर्भात पावसाच्या या १२० दिवसांत ८६ टक्क्यांची तूट आहे. सरासरीपेक्षा ११५ मिमी पाऊस कमी पडला. अकोला व वाशिम वगळता उर्वरित तीन जिल्ह्यांतील ४६ तालुके पावसात माघारले आहेत. त्यामुळे भूजलातही मोठ्या प्रमाणात कमी असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

विदर्भात जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत पावसाचे १२० दिवस गृहीत धरण्यात येतात.  यानंतर बरसणाऱ्या पावसाची अवकाळी नोंद होते. शासनाच्या योजना व सवलती व तसेच पाऊस कमी असल्यास उपाययोजना या चार  महिन्याच्या आकडेवारीवरच आधारीत असतात. तसेच या चार महिन्यात प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू असतो. या कालावधीत पावसाची मंडलनिहाय नोंद घेण्यात येते. मात्र, ३० सप्टेंबरनंतर फक्त अवकाळी पाऊस आल्यासच नोंद घेण्यात येते. 

पश्चिम विदर्भात या कालावधीत ७७८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही ८६ टक्केवारी आहे.  यामध्ये अकोला जिल्ह्यात १००.६ व वाशिम जिल्ह्यात १००.८ मिमी पावासाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात ८१४ मिमी पाऊस अपेक्षित असतांना ६३३ मिमी, यवतमाळ जिल्ह्यात ९११ मिमी अपेक्षित असताना ७१२ मिमी, तर बुलडाणा जिल्ह्यात ६६७ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४६६ मिमी पाऊस पडला. विभागातील अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर, अकोला जिल्ह्यात अकोला, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर यवतमाळ जिल्ह्यात आर्णी व पुसद, वाशिम जिल्ह्यात मालेगाव, मंगरूळ पीर व कारंजा या नऊ तालुक्यातच पावसाने सरासरी गाठली आहे उर्वरित ४६ तालुके पावसाच्या सरासरीत माघारल्याने येत्या रबी हंगामावरही दुष्काळाचे सावट आहे.

प्रकल्प तहानले, रबी धोक्यात

विभागात अपुऱ्या पावसाअभावी नऊ मध्यम प्रकल्पात अत्यल्प साठा आहे यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा १८ टक्के, पेनटाकळी १९, पलढग ३१.३२, मस २.५३, कोराटी ८.९३, मन २५.६६, तोरणा १४ तर उतावळी प्रकल्पात ३९ मिमी जलसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत २४ मध्यम प्रकल्पात सरासरीच्या ७१ टक्के तर ४६६ लघुप्रकल्पात ६३.७३ टक्के साठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे जमिनीतही आर्द्रता कमी असल्याने यंदाच्या रबीवर थेट असर होणार आहे. एकंदरीत यंदा वेळीच उपाययोजना न केल्यास पिण्याच्या पाण्याची बकट समस्या निर्माण होऊ शकते. 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस