शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

वऱ्हाडातील ४६ तालुक्यात पावसाची तूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 18:01 IST

शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे.

अमरावती - शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे. पश्चिम विदर्भात पावसाच्या या १२० दिवसांत ८६ टक्क्यांची तूट आहे. सरासरीपेक्षा ११५ मिमी पाऊस कमी पडला. अकोला व वाशिम वगळता उर्वरित तीन जिल्ह्यांतील ४६ तालुके पावसात माघारले आहेत. त्यामुळे भूजलातही मोठ्या प्रमाणात कमी असल्याने आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

विदर्भात जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत पावसाचे १२० दिवस गृहीत धरण्यात येतात.  यानंतर बरसणाऱ्या पावसाची अवकाळी नोंद होते. शासनाच्या योजना व सवलती व तसेच पाऊस कमी असल्यास उपाययोजना या चार  महिन्याच्या आकडेवारीवरच आधारीत असतात. तसेच या चार महिन्यात प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू असतो. या कालावधीत पावसाची मंडलनिहाय नोंद घेण्यात येते. मात्र, ३० सप्टेंबरनंतर फक्त अवकाळी पाऊस आल्यासच नोंद घेण्यात येते. 

पश्चिम विदर्भात या कालावधीत ७७८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही ८६ टक्केवारी आहे.  यामध्ये अकोला जिल्ह्यात १००.६ व वाशिम जिल्ह्यात १००.८ मिमी पावासाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात ८१४ मिमी पाऊस अपेक्षित असतांना ६३३ मिमी, यवतमाळ जिल्ह्यात ९११ मिमी अपेक्षित असताना ७१२ मिमी, तर बुलडाणा जिल्ह्यात ६६७ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४६६ मिमी पाऊस पडला. विभागातील अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर, अकोला जिल्ह्यात अकोला, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर यवतमाळ जिल्ह्यात आर्णी व पुसद, वाशिम जिल्ह्यात मालेगाव, मंगरूळ पीर व कारंजा या नऊ तालुक्यातच पावसाने सरासरी गाठली आहे उर्वरित ४६ तालुके पावसाच्या सरासरीत माघारल्याने येत्या रबी हंगामावरही दुष्काळाचे सावट आहे.

प्रकल्प तहानले, रबी धोक्यात

विभागात अपुऱ्या पावसाअभावी नऊ मध्यम प्रकल्पात अत्यल्प साठा आहे यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा १८ टक्के, पेनटाकळी १९, पलढग ३१.३२, मस २.५३, कोराटी ८.९३, मन २५.६६, तोरणा १४ तर उतावळी प्रकल्पात ३९ मिमी जलसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत २४ मध्यम प्रकल्पात सरासरीच्या ७१ टक्के तर ४६६ लघुप्रकल्पात ६३.७३ टक्के साठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे जमिनीतही आर्द्रता कमी असल्याने यंदाच्या रबीवर थेट असर होणार आहे. एकंदरीत यंदा वेळीच उपाययोजना न केल्यास पिण्याच्या पाण्याची बकट समस्या निर्माण होऊ शकते. 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊस