शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

फळगळतीने घेतला संत्रा उत्पादकांचा बळी

By admin | Updated: September 17, 2014 23:28 IST

संत्रा फळगळतीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या संत्रा उत्पादकांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून त्याचा पहिला बळी चांदूरबाजार तालुक्यातील कल्होडी येथील काशिनाथ निकम हा संत्रा उत्पादक ठरला आहे.

वयोवृध्द शेतकऱ्याची आत्महत्या : कोल्हाडी येथील घटना चांदूरबाजार : संत्रा फळगळतीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या संत्रा उत्पादकांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले असून त्याचा पहिला बळी चांदूरबाजार तालुक्यातील कल्होडी येथील काशिनाथ निकम हा संत्रा उत्पादक ठरला आहे. या संत्रा उत्पादकाने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. काशिनाथ किसनराव निकम (६५,रा. कल्होडी, सर्फापूर) यांनी स्वबळावर शेती घेऊन त्यावर संत्राबाग उभी केली. पत्नी, सुना, नातवंडांचे मोठे कुटुंब या बागेवर उपजिविका भागवित होते. बागेच्या देखभालीसाठी त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. आंबिया बहराच्या विक्रीतून आलेल्या पैशातून बँकेच्या कर्जाचा भरणा करणे व उरलेल्या पैशातून अन्य खर्चाचे नियोजन त्यांनी केले होते. दरम्यान संत्रा फळांना गळतीचा रोग लागला. प्रचंड गळतीमुळे निम्म्यापेक्षा अधिक संत्राफळे जमीनदोस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. आता झालेले नुकसान भरून निघणार नाही, अशी भावना काशिनाथ यांची झाली. यातून सावरण्यासाठी त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची अपेक्षा होती. शासन यंत्रणेकडून झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.मात्र, या मोबदल्याची रक्कम नेमकी किती व केव्हा मिळणार? याबाबत शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीच माहिती देण्यात आली नाही. याच चिंतेमध्ये त्यांनी शेतातील झाडाला दुपट्टा बांधून गळफास घेतला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काशिनाथ निकम यांना सन २०१० मध्ये सेवासंस्थेकडून उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)