शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

गावकऱ्यांचे श्रद्धास्थान वरूड (बगाजी) महालक्ष्मी ११७ वर्षांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:03 IST

आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. प्रदीपराव देशमुख मोठ्या श्रद्धेने करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात.

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील वरुड (बगाजी) येथील अ‍ॅड. प्रदिप देशमुख यांच्याकडील महालक्ष्मी उत्सवास ११७ वर्षे पूर्ण होत आहेत. या उत्सवाचे महत्व अमरावती जिल्हयातील वरुड (बगाजी) व परिसरातील व्यक्तीना अनन्यसाधारण आहे. वरुड (बगाजी) येथील प्रगतशील शेतकरी कर्मयोगी स्व. श्री बापूरावजी ऊर्फ काकासाहेब देशमुख यांनी या महालक्ष्मी उत्सवाचे महत्व समजून १०० वर्षापूर्वी ज्या गोरगरीब मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी शेतमजुरांना पूर्णवेळ जेवण मिळत नव्हते अशा गावकऱ्यांना महाप्रसादाच्या रूपाने ते आपल्या वाड्यामध्ये मिष्ठान्न भोजनासाठी निमंत्रित करीत असे, गावकरी मोठ्या श्रध्येने त्यांच्या या सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होत असत.

आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. प्रदीपराव देशमुख हायकोर्ट नागपूर मोठ्या श्रद्धेने करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात. या दिवशी या गावामध्ये अनेक घरी महालक्ष्मी असल्याने कोणाच्याही घरी वेगळी चूल पेटविली जात नाही. या दिवशी गावकऱ्यांना व प्रत्येक पाहुण्यास देशमुखांकडे महालक्ष्मीच्या दर्शनाचे व महाप्रसादाचे निमंत्रण असते सर्व गावकऱ्यांना जेवणासोबत मिष्ठान्न व आंबील चा प्रसाद वाढला जातो. ही प्रथा गेल्या ११७ वर्षांपासून चालत आलेली आहे. यावर्षी हा उत्सव दिनांक १०,११,१२ सप्टेंबर २०२४ रोजी अनुराधा नक्षत्रावर आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या दिवसापासून ते ५ दिवस मानकरी घरांना जेवणाचे निमंत्रण असते, तर पहिल्या दिवशी आरती करून श्री महालक्ष्मीचे आगमन होते. 

दुसऱ्या दिवशी १६ भाज्या, मिष्ठान्न व आंबीलचा नैवेद्य दिला जातो, तर आघाडा, केना, दुर्वा आणि सुवासीक फुले वाहिली जातात. तिसऱ्या दिवशी स्वासीन महिलांद्वारे त्याची ओटी भरून मनभावे पूजा करून त्यांची रवानगी करण्याची प्रथा आहे. चवथ्या दिवशी आंबील व फळांचा प्रसाद करून कार्यक्रमाची सांगता केली जाते. देशमुख कुटुंबातील मंडळी ५ दिवस या कार्यक्रमासाठी जातीने उपस्थित असतात. नविन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हस्ते आरती करण्याची परंपरा व प्रथा आहे. 

देशमुखांकडे हा महालक्ष्मी उत्सव गेल्या ३१० वर्षांपासून होत असल्याचे गावकरी सांगतात. हि परंपरा ऐतिहासिक राजे भोंसले कालीन असल्याचे सांगतात या दिवशी गावकरी दिवाळीचा सण समजून जावई व मुलींना घरी बोलावून देशमुखांकडील महालक्ष्मीच्या दर्शनाला पाठवितात. पूर्वी हा सन देशमुखाकडील ऐतिहासिक गडीमध्ये आयोजीत करण्यात येत असे ही गढी संत बगाजी सागर धरणात गेलेली आहे. गढीला १०० फुट उंच ४ मोठे बुरुज होते. पूर्वेकडील बुरुजाजवळील चौकात महालक्ष्मी बसविल्या जात होती. तर ५ वर्षातून एकदा वर्धा नदी माय (पौराणिक नाव वशिष्ठा) महापुराचे निमित्याने देशमुखांच्या वाड्याला आंघोळ घालून महालक्ष्मीचे दर्शन घेत असे. अशा प्रसंगाला गावकरी स्वतःला धन्य समजत असे. 

टॅग्स :Amravatiअमरावती