शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

गावकऱ्यांचे श्रद्धास्थान वरूड (बगाजी) महालक्ष्मी ११७ वर्षांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 16:03 IST

आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. प्रदीपराव देशमुख मोठ्या श्रद्धेने करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात.

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील वरुड (बगाजी) येथील अ‍ॅड. प्रदिप देशमुख यांच्याकडील महालक्ष्मी उत्सवास ११७ वर्षे पूर्ण होत आहेत. या उत्सवाचे महत्व अमरावती जिल्हयातील वरुड (बगाजी) व परिसरातील व्यक्तीना अनन्यसाधारण आहे. वरुड (बगाजी) येथील प्रगतशील शेतकरी कर्मयोगी स्व. श्री बापूरावजी ऊर्फ काकासाहेब देशमुख यांनी या महालक्ष्मी उत्सवाचे महत्व समजून १०० वर्षापूर्वी ज्या गोरगरीब मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी शेतमजुरांना पूर्णवेळ जेवण मिळत नव्हते अशा गावकऱ्यांना महाप्रसादाच्या रूपाने ते आपल्या वाड्यामध्ये मिष्ठान्न भोजनासाठी निमंत्रित करीत असे, गावकरी मोठ्या श्रध्येने त्यांच्या या सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होत असत.

आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. प्रदीपराव देशमुख हायकोर्ट नागपूर मोठ्या श्रद्धेने करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात. या दिवशी या गावामध्ये अनेक घरी महालक्ष्मी असल्याने कोणाच्याही घरी वेगळी चूल पेटविली जात नाही. या दिवशी गावकऱ्यांना व प्रत्येक पाहुण्यास देशमुखांकडे महालक्ष्मीच्या दर्शनाचे व महाप्रसादाचे निमंत्रण असते सर्व गावकऱ्यांना जेवणासोबत मिष्ठान्न व आंबील चा प्रसाद वाढला जातो. ही प्रथा गेल्या ११७ वर्षांपासून चालत आलेली आहे. यावर्षी हा उत्सव दिनांक १०,११,१२ सप्टेंबर २०२४ रोजी अनुराधा नक्षत्रावर आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या दिवसापासून ते ५ दिवस मानकरी घरांना जेवणाचे निमंत्रण असते, तर पहिल्या दिवशी आरती करून श्री महालक्ष्मीचे आगमन होते. 

दुसऱ्या दिवशी १६ भाज्या, मिष्ठान्न व आंबीलचा नैवेद्य दिला जातो, तर आघाडा, केना, दुर्वा आणि सुवासीक फुले वाहिली जातात. तिसऱ्या दिवशी स्वासीन महिलांद्वारे त्याची ओटी भरून मनभावे पूजा करून त्यांची रवानगी करण्याची प्रथा आहे. चवथ्या दिवशी आंबील व फळांचा प्रसाद करून कार्यक्रमाची सांगता केली जाते. देशमुख कुटुंबातील मंडळी ५ दिवस या कार्यक्रमासाठी जातीने उपस्थित असतात. नविन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हस्ते आरती करण्याची परंपरा व प्रथा आहे. 

देशमुखांकडे हा महालक्ष्मी उत्सव गेल्या ३१० वर्षांपासून होत असल्याचे गावकरी सांगतात. हि परंपरा ऐतिहासिक राजे भोंसले कालीन असल्याचे सांगतात या दिवशी गावकरी दिवाळीचा सण समजून जावई व मुलींना घरी बोलावून देशमुखांकडील महालक्ष्मीच्या दर्शनाला पाठवितात. पूर्वी हा सन देशमुखाकडील ऐतिहासिक गडीमध्ये आयोजीत करण्यात येत असे ही गढी संत बगाजी सागर धरणात गेलेली आहे. गढीला १०० फुट उंच ४ मोठे बुरुज होते. पूर्वेकडील बुरुजाजवळील चौकात महालक्ष्मी बसविल्या जात होती. तर ५ वर्षातून एकदा वर्धा नदी माय (पौराणिक नाव वशिष्ठा) महापुराचे निमित्याने देशमुखांच्या वाड्याला आंघोळ घालून महालक्ष्मीचे दर्शन घेत असे. अशा प्रसंगाला गावकरी स्वतःला धन्य समजत असे. 

टॅग्स :Amravatiअमरावती