शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

By गणेश वासनिक | Updated: September 12, 2022 17:43 IST

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर

अमरावती : देशात १९५२ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेशातून चित्ता नामशेष झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले. आता तब्बल ७२ वर्षानंतर चित्ता भारतात येत आहे, त्याअनुषंगाने वनविभागाने या इव्हेंटची जोरदार तयार चालविली आहे. चित्ता हा शेडुल्ड १ च्या वन्यजीव असून, याविषयी शाळा, महाविद्यालयात जनजागृती केली जाणार आहे. प्रचार व प्रसारासासाठी वन विभाग पुढाकार घेणार आहे. 

गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्या पेक्षा चपळ आणि हटके आहे. १९५२ मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून  नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले होते. त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०२० मध्ये अफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. आता  दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडणार आहे, हा प्रकल्प समृद्ध गवताळ प्रदेश असून त्या भागात आफ्रिकन चित्ता वास्तव्य करणार आहे. तेथे सोलर कुंपण करुन त्या चित्त्यावर निगराणी ठेवली जाणार आहे.जगात केवळ सात हजार चित्ते

एकेकाळी जगाच्या पाठीवर भारतात १८०० चित्त होते.  मात्र, शिकारीमुळे १९५२ मध्ये हे सर्व चित्त संपले. चित्ते हे सध्या अलगेरीया, अंगोला, बेनीन, बुकींनामध्ये आफ्रिका, इरान, केनिया, नमीबिया, निमर, टांझानीया, युगाेंडा, झिबाॅब्मे अशा १७ देशात आढळतो. हल्ली संख्या ७ हजार आहे. चित्त्यासाठी मध्य प्रदेश व राजस्थान हे प्रमुख जंगल महत्वाचे आहे. भारतात चित्ता रमला की त्याची संख्या वाढीस वेळ लागणार नाही, हे मात्र निश्चित.अनुसूचित एक मध्ये चित्ता

चित्ता हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ प्रमाणे अनुसूची १ मध्ये मोडतो. त्याच्या अंगावर सरळ, गोत काळे ठिपके असतात, जे बिबट्यापेक्षा वेगळे दिसतात. चित्ता हा जगातला सर्वाधिक वेगवान प्राणी असून तो प्रति ताशी ११३ किमी अंतर धाऊ शकतो, वजन केवळ ५५ किलो असते. त्याची मान बारीक असून शरीराची रचना एखाद्या आधुनिक बाईक प्रमाणे आहे. तो जंगलात साधारणत: १३ वर्षे जगु शकतो. गवताळ प्रदेशात तो चांगला रमतो.केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण विभागाच्या गाईडलाईननुसार चित्त्याविषयी शाळा, महाविद्यालयात पोस्टर, जनजागृती केली जाणार आहे. चित्त्याचा ईतिहास, भारतातील जुने वास्तव आदी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. त्याअनुषंगाने वन विभागाने तयारी चालविली आहे. 

- सुनील लिमय, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागAmravatiअमरावतीGovernmentसरकारenvironmentपर्यावरणforestजंगल