शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनींचे महालेखाकारांकडून परीक्षण, गैरव्यवहाराची चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 18:34 IST

राज्यात महसूल विभागाने १४ एप्रिल १९७६ पासून विविध कामांच्या नावे ताब्यात घेतलेल्या वनजमिनी परत केल्या नाहीत तसेच आतापर्यंत एकाही वरिष्ठ वनाधिकाºयाने त्या परत घेण्याचे धाडस दाखविले नाही. आता या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार असून, गैरव्यवहार असल्यास त्याची चौकशी होईल, असे पत्र ‘कॅग’ने जारी केले आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : राज्यात महसूल विभागाने १४ एप्रिल १९७६ पासून विविध कामांच्या नावे ताब्यात घेतलेल्या वनजमिनी परत केल्या नाहीत तसेच आतापर्यंत एकाही वरिष्ठ वनाधिकाºयाने त्या परत घेण्याचे धाडस दाखविले नाही. आता या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार असून, गैरव्यवहार असल्यास त्याची चौकशी होईल, असे पत्र ‘कॅग’ने जारी केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच वनजमिनींबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. गत ३७ वर्षांपासून ‘महसूल’च्या ताब्यात असलेली आठ लाख हेक्टर वनजमीन परत करण्यासाठी राज्याच्या वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी २ डिसेंबर २०१६ रोजी आदेश जारी केले होते. मात्र, या आदेशाला ‘महसूल’ने जुमानले नाही. वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी शासनस्तरावर बैठकांचे सत्र चालते. त्यानंतर ‘जैसे थे’ होते, हा शिरस्ता आहे. दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने आढावा घेताना ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनी परत घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्यात. मात्र, ‘महसूल’सोबत कोण वैर घेईल; त्यापेक्षा ‘टाइमपास’ करण्यातच यापूर्वीच्या तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी भूमिका घेतली आहे. वनविभागाला घरचा आहेरमहसूल विभागाकडे असलेल्या वनजमिनींचा ‘प्रसाद’ कुणाला मिळाला, यासंदर्भात १ जानेवारी २००० पासून उच्चस्तरीय चौकशी केल्यास डझनाहून जास्त तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक आरोपींच्या पिंजºयात उभे राहतील, असा दावा सेवानिवृत्त उपवनसंरक्षक हेमंत छाजेड यांनीच मुंबई येथील प्रधान महालेखाकारांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीचा हवाला देत ‘कॅग’ने १२ जानेवारी रोजी राज्य शासनाला पत्र पाठविताना ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिनींचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. 

२० लाख हेक्टर वनजमिनीचे झाले नुकसान वनजमिनींचे वाटप करताना वरिष्ठ वनाधिका-यांनी नियमावली गुंडाळली. यामध्ये २० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. यात रत्नागिरी/रायगड जिल्ह्यात ८०१९३, सिंधुदुर्ग - ३८५२१, मुंबई उपनगर - २४२६, नाशिक - २०९६१, ठाणे - ५०७३८, धुळे/नंदुरबार - ७५३९०, जळगाव - ७, अहमदनगर - ४३२८६, पुणे - ४६४२२, सातारा - ८३०७, कोल्हापूर - १७१९४, सोलापूर - १९१३९, सांगली - १३७६७, बुलडाणा - ४३३२३, अकोला - ६९७७, यवतमाळ/वाशिम - ७६७१६, अमरावती - ११७२०, नागपूर - ५१७७८, भंडारा/गोंदिया - ५६२९०, चंद्रपूर/गडचिरोली - ५६२९०, नांदेड - ११२०, बीड - १०९९९, लातूर - ३३७८, उस्मानाबाद जिल्ह्यात ७०८१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती