शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

आरओबीच्या मुद्यावर प्रशासनाला ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 1:16 AM

आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा, असा अल्टिमेटमच खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देनवनीत राणा : पादचारी, दुचाकीस्वारांसाठी अंडरपास त्वरित सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा, असा अल्टिमेटमच खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिला.३१ जुलैपर्यंत काम पूर्ण होईल. दस्तुरनगरकडील मार्ग जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. रेल्वेचे काम आटोपल्यानंतर बांधकाम विभागाचे काम करता येणार असल्याचे रेल्वेचे अधिकारी वाय.डी. राव यांनी सांगितले. यावर खासदरांनी बैठकीपश्चात पाहणी करून किमान नागरिक व दुचाकीसाठी अंडरपास सुरू करता येईल काय, याची पाहणी करून तोडगा काढण्यास सुचविले. बैठकीला आमदार रवि राणा, आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहआयुक्त नरेंद्र पिठे, विभागीय अधिकारी नीलेश बेलसरे, सहायक वाहतूक अधीक्षक वैशाली भाकरे, रेल्वेचे डिझाइन इंजिनीअर एन.पी. पाटील, उपअभियंता एस.एन, जसवंते, नायब तहसीलदार विजय मांजरे, वाहतुक शाखेचे राहूल आठवले, सिटी बसचे विपीन चव्हाण यांच्यासह युवा स्वाभिमाने नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. वेळेचे बंधन पाळा, विहीत मुदतीच्या आत पुर्ण करण्याच्या सूचना खासदार राणा यांनी दिल्या.शहरातील मध्य भागात काम करीत आहात, याचे भान ठेवा. तीन वर्षांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वे विभागाद्वारे दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यामुळे किमान नागरिकांना पायी चालण्यासाठी तसेच दुचाकीसाठी आजच रस्ता मोकळा करा, अशी सूचना आमदार रवि राणा यांनी दिली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सायंकाळपर्यंत याची माहिती देतो, असे वाय.डी. राव म्हणाले. मुदतीच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी दिले. यावेळी शहर विकासासंदर्भात अनेक मुद्द्यांवर चर्चा पार पडली.शहर बस वाहतूक शाखेची पोलखोलशहराच्या २० किमी हद्दीत शहर बस सेवा सुरू करण्याला प्रधान सचिवांनी मंजुरी दिली. मात्र, महापालिकेत त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी सहा महिन्यांपासून झालेली नाही, याबाबत आ. रवि राणा यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ४० बस मंजूर; रस्त्यावर २५ आहेत. विद्यार्थ्यांना सुविधा नाहीत, याबाबत आ. राणा यांनी खडे बोल सुनावले.अकोली वळणरस्त्याला गती केव्हा?अकोली, चमननगर रस्त्याकरिता भूसंपादनासाठी १२ कोटींचा निधी खेचून आणला; मात्र प्रशासनाच्या दिरंगाईने प्रक्रियाच मंदावली. जागा उपलब्ध असल्याने ‘त्या’ २७ लोकांची बैठक लावण्याची सूचना गणेश कुत्तरमारे यांना आ. राणा यांनी केली. प्रस्तावाची फाईल या आठवड्यात जिल्ह्याधिकाºयांसमक्ष ठेवा, असे आ. राणा म्हणाले.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा