शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोन ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 15:54 IST

तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देजखमींमध्ये चिमुकल्यांचाही समावेश

कुऱ्हा (अमरावती) : कुऱ्हा ते कौंडण्यपूर फाट्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार तर तीनजण जखमी झाले. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ८च्या सुमारास हा अपघात घडला.

पुरूषोत्तम नारायण गांधी (६०, रा. खरांगणा, ता. आर्वी, जि. वर्धा) व प्रवीण श्रीराम आडे (३५, रा. कारला, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) अशी अपघातातील मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत प्रवीण यांच्या आई सुभा श्रीराम आडे (५५ ), वंश प्रवीण आडे ( ७ वर्षे ) यशवंत प्रवीण आडे (५ वर्षे सर्व रा. कारला) हे तिघे जखमी असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रवीण आडे हे आई व दोन लहान मुलांसह जवळच्या मारडा गावात रविवारी झालेल्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. लग्न आटोपल्यानंतर एका दुचाकीवरून चौघे जण मारडा येथून कारला गावाकडे परत येत होते. कुऱ्हा ते कौंडण्यपूर मार्गावरील वळणावर चौफुलीसमोर विरूद्ध दिशेने येणारी दुचाकी वेगात असल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली. दोन्ही दुचाकींचा वेग अधिक होता. शिवाय दुचाकीवर चौघे असल्याने त्यांना वळणावर वेग कमी करता आला नाही. त्यामुळे दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडकल्या. 

प्रवीण आडे, त्यांच्या आई व दोन लहान मुले असे चौघे एका दुचाकीवर, तर दुसऱ्या दुचाकीवर पुरूषोत्तम गांधी होते. पाचही जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पुरूषोत्तम गांधी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर जखमी प्रवीण आडे यांना पुढील उपचारासाठी पीडीएमसी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान प्रवीण आडे यांचाही दुपारी मूत्यू झाला, असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले. समोरासमोर अपघात झाल्याची माहिती कुऱ्हा पोलिसांना दुपारी दोनच्या सुमारास समजली. परंतु तक्रार नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे कुऱ्ह्याचे ठाणेदार संदीप बिरांजे यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक