शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

धामणगाव तालुक्यात दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; शेतकऱ्यांना मिळणार अखंडित वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:26 IST

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

मोहन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून सौरऊर्जा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. डिसेंबर २०२४ ते आजपर्यंत तालुक्यात दहा मेगावॉट क्षमतेचे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांद्वारे अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे राज्यात प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौरऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत वीज उपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसा वीज मिळणार असली तरी पाण्याचा उपसा मर्यादित ठेवण्याची गरज आहे.

असे आहेत प्रकल्पधामणगाव तालुक्यात दाभाडा, नारगावंडी, जुना धामणगाव येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राअंतर्गत ३० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

मंगरूळ, देवगाव परिसरातील शेतकऱ्यांना मिळतेय वीजजळगाव येथून मंगरूळ दस्तगीर उपकेंद्र, तर उसळगव्हाणमधून देवगाव अशा दोन उपकेंद्रांतून निघणाऱ्या कृषी वीज वाहिन्यांवरील अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. दिवसा वीजपुरवठा होत असल्यामुळे शाश्वत शेती करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे पूर्णत्वास आले आहे. महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

"धामणगाव मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती आली आहे. सध्या दोन प्रकल्पांमधून अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे."- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे

"आमच्या भागात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याने आम्हाला दिवसा विजेचा वापर मिळत आहे. आ. प्रताप अडसड यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला ही वीज मिळत आहे."- साहेबराव पाटील, शेतकरी, कावली

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती