शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

धामणगाव तालुक्यात दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; शेतकऱ्यांना मिळणार अखंडित वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:26 IST

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

मोहन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून सौरऊर्जा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. डिसेंबर २०२४ ते आजपर्यंत तालुक्यात दहा मेगावॉट क्षमतेचे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांद्वारे अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे राज्यात प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौरऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत वीज उपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसा वीज मिळणार असली तरी पाण्याचा उपसा मर्यादित ठेवण्याची गरज आहे.

असे आहेत प्रकल्पधामणगाव तालुक्यात दाभाडा, नारगावंडी, जुना धामणगाव येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राअंतर्गत ३० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

मंगरूळ, देवगाव परिसरातील शेतकऱ्यांना मिळतेय वीजजळगाव येथून मंगरूळ दस्तगीर उपकेंद्र, तर उसळगव्हाणमधून देवगाव अशा दोन उपकेंद्रांतून निघणाऱ्या कृषी वीज वाहिन्यांवरील अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. दिवसा वीजपुरवठा होत असल्यामुळे शाश्वत शेती करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे पूर्णत्वास आले आहे. महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

"धामणगाव मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती आली आहे. सध्या दोन प्रकल्पांमधून अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे."- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे

"आमच्या भागात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याने आम्हाला दिवसा विजेचा वापर मिळत आहे. आ. प्रताप अडसड यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला ही वीज मिळत आहे."- साहेबराव पाटील, शेतकरी, कावली

टॅग्स :electricityवीजAmravatiअमरावती