शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

फवारणी प्रकरणातील 'ते' दोन शेतकरी कीटकनाशक विषबाधेचेच बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:48 IST

अमरावतीत कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेला.

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेला. कृषी विभाग टाळाटाळ करीत होता; मात्र वैद्यकीय अहवालाअंती दोघांचाही मृत्यू कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेनेच झाला असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही प्रकरणात शासकीय मदतीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माहितीनुसार, यंदा जानेवारीपासून आतापर्यंत कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याचे १५३ रुग्ण दाखल झाले. यवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात ३५ शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रामुख्याने हा प्रश्न चर्चेत आला. शासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्यानंतर जिल्ह्यातदेखील अश्या घटनांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे एकाही शेतक-याचा मृत्यू झालेला नाही, यावर जिल्हा प्रशासन ठाम होते. मात्र, ७ आॅक्टोबरनंतर विविध रुग्णालयांकडून माहिती आल्यानंतर दोन महिन्यात दोन शेतक-यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने तत्त्वत: मान्य केली आहे.१ जानेवारी ते ७ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत १५३ विषबाधेचे रुग्ण दाखल झालेत व यापैकी दोन शेतक-यांचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी विभागाने सामान्य रुग्णालयाच्या हवाल्याने दिली. यामध्ये माहुली जहागीर ठाण्याच्या हद्दीतील डवरगाव येथे प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्याच्या हद्दीतील म्हैसपूर येथे किरण ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. यापैकी आवारे यांच्या नावाने सातबारा आहे, तर ठाकरे यांच्या वडिलांच्या नावाने जमीन आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून शासकीय मदत देण्यात येणार आहे.आॅक्टोबरमध्ये विषबाधेचे २९ रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयात १ आॅक्टोबरपासून कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधेतून २९ रुग्ण दाखल झालेत. १ जानेवारीपासून आतापर्यंत १५३ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालात नमूद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये किती रुग्णांनी विषबाधेचा उपचार घेतला, याची नेमकी माहिती शासकीय यंत्रणेजवळ नाही.ही आहेत विषबाधेची कारणेयंदा कपाशीची झालेली वाढ ही माणसांच्या उंचीपेक्षा अधिक असल्याने या पिकावर फवारणी करताना हवेची दिशा बदलल्यास फवारा थेट शेतकºयांच्या चेह-यावर उडतो आणि नाकातोंडातून विष थेट शरीरात जाते. बॅटरीमुळे गतीने चालणा-या चायना स्प्रे पंपाचा वापर, अप्रमाणित व अतिशय जहाल कीटकनाशकांची फवारणी, यंदा सप्टेंबरपासूनच कडक उन्हाचे चटके असल्याने शेतक-यांना आलेल्या घामामुळे त्वचेच्या छिद्रातून कीटकनाशकाचा अंश शरीरात भिनतो आदी कारणांमुळे शेतक-यांना कीटकनाशकांची विषबाधा होते.कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेमुळे दोन शेतक-यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालाने हे स्पष्ट केले आहे. शासकीय मदत मिळण्यासाठी दोन्ही प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहेत.अनिल खर्चान,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी