शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST

अमरावती: एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर ...

अमरावती: एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर रोजी जाहीर केला. या ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होईल. मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.

५५३ ग्रामपंचायतींसाठी प्रारूप मतदार यादी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर ७ डिसेंबरपर्यंत हरकती घेण्यात आल्या. ९ डिसेंबर रोजीच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, ११ डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ती कायम राहणार आहे. या कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती अथवा घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करावा लागेल तसेच मतदान हे सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत राहणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

बॉक्स

असा आहे निवडणूक कार्यक्रम

तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे -१५ डिसेंबर. उमदेवारी अर्ज दाखल करणे २३ ते ३० डिसेंबर (२५, २६ व २७ डिसेंबरची सुटी वगळून). उमेदवारी अर्जाची छाननी - ३१ डिसेंबर. अर्जांची माघार - ४ जानेवारी. चिन्हवाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - ४ जानेवारी (दुपारी ३ पर्यंत). मतदान १५ जानेवारी. मतमोजणी १८ जानेवारी.

बॉक्स

तालुकानिहाय ग्रामपंचायती

तालुका ग्रामपंचायत सदस्य प्रभाग

अमरावती ४६ १५४ ४१६

भातकुली ३६ ११६ ३१२

तिवसा २९ ०९८ २६१

दर्यापूर ५० १६३ ४४४

मोशी ३९ १३१ ३४९

वरूड ४१ १३९ ३९७

अंजनगाव ३४ ११७ ३१२

अचलपूर ४४ १४७ ३९९

धारणी ३५ १२१ ३३३

चिखलदरा २३ ०७१ १९९

नांदगाव खं ५१ १५९ ४१९

चांदूर रेल्वे २९ ९३ २३५

चांदूर बाजार ४१ १४० ३८१

धामणगाव रे ५५ १७४ ४५७

एकूृण ५५३ १८२३ ४८९६

बॉक्स

१८२३ प्रभागांमधून ४८९६ सदस्य निवडणार

जिल्हाभरात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवणूकीसाठी होऊ घातलेल्या मतदात प्रक्रियेद्वारे १८२३ प्रभागांमधून सुमारे ४ हजार ८९६ सदस्य मतदार आपल्या ग्रामपंचायतींचे सदस्य निवडणार आहेत.