शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आदिवासी मजुरांना नेणारा ट्रॅक्टर उलटला, २० जखमी तीन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 21:25 IST

तीन गंभीर : अंजनगाव थांब्यावरील घटना 

परतवाडा (अमरावती) : लगतच्या बेलखेडा आणि हत्तीघाट या आदिवासी पाड्यातील जवळपास ४० मजुरांना पांढरी येथे घेऊन जाणारा भरधाव  ट्रॅक्टर उलटला. या अपघातात तीन मजूर गंभीर, तर २० जण किरकोळ जखमी झाले.  सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अंजनगाव थांब्यालगत ही घटना घडली.  या घटनेने अकोला-चिखलदरा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

एमएच ३० बी ८८०९ या  क्रमांकाचा ट्रॅक्टरमधून ४० मजूर नजीकच्या पांढरी येथे शेतात पेरणीसाठी जात होते. अंजनगाव थांब्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली उलटली. त्यात काही मजूर रस्त्यावर फेकले गेले, तर काही ट्रॉलीखाली दबले. त्यात त्यांच्या हातापायासह डोक्याला मार लागला. त्यातील रूपी रामचंद्र काळे (२५, रा. बेलखेड़ा), नीला अशोक सावरकर (२४, रा. हत्तीघाट), पिंकी बावसकर (१४, रा. हत्तीघाट) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य जखमींमध्ये उषा सावरकर (१८), दुर्गा राजू बावसकर (२५), यशोदा शंकर दहीकर (१७), लीला अशोक सावरकर (२३), सपना मनोहर बेलसरे (२५), सचिन भोला बेलसरे  (२१), बाली राजू बेलसरे (१५), मीना गणेश दारसिंबे (३०), राजू रमेश पाटणकर (२१), संतोष संतू बेठेकर (२४, सर्व रा. हत्तीघाट) व गंगू मंगल भूसूम (५०),  चैता सोमा कासदेकर (२५), रामरती रामकिशन उमरकर (२५),  बाला अखंडे (४०), किरण नामदेव जामूनकर (१८),  रविना बंसी  भुसूम (१६), सोनू गंगाराम दारसिंबे (३०, सर्व रा. बेलखेडा) आदींचा समावेश आहे.

वाहतूक पोलीस शहराबाहेरपरतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांतील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था सतत चर्चेत असताना, येथील वाहतूक विभागाचे कर्मचारी शहराबाहेर दिसत असल्याचे सर्वश्रुत आहे. ट्रॅक्टरमध्ये मजुरांना बेदरकार कोंबून नेले जात असतानाही कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. वाहतूक पोलीस शहर वाºयावर सोडून धारणी, अमरावती व अकोला या महामार्गावर वसुलीत मग्न असल्याची तक्रार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे झालेल्या एका बैठकीत केली होती. त्यानंतरसुद्धा कुठल्याच प्रकारची सुधारणा झाली नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmravatiअमरावती