शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

टोमॅटो विक्रेते कमावतायत १०० टक्के नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:50 PM

उन्हाचा पारा वाढल्याने काही भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. सद्यस्थितीत टोमॅटोचे दर चढीचे आहेत. किरकोळ व्यावसायिकांनी याचाच फायदा घेऊन कृत्रिम भाववाढ केली आहे.

ठळक मुद्देभाजीबाजारात २८ रुपये तेच किरकोळ बाजारात ६० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाचा पारा वाढल्याने काही भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. सद्यस्थितीत टोमॅटोचे दर चढीचे आहेत. किरकोळ व्यावसायिकांनी याचाच फायदा घेऊन कृत्रिम भाववाढ केली आहे. टोमॅटोची ठोक विक्री २८ ते ३२ रुपये प्रतिकिलो होत असताना, किरकोळ विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. किरकोळ व्यावसायिक यातून शंभर टक्के नफा कमावित आहेत. सदर भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहेत.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीबाजारात बुधवारी केवळ ४० क्विंटल टोमॅटोची आवक झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले टोमॅटो बाजार समितीत विक्रीसाठी आणण्यात आणले होते. बुधवारी टोमॅटोला प्रतिक्विंटल कमीत कमी २८०० ते जास्तीत जास्त ३२०० रुपये भाव मिळाला. मंडईतून किरकोळ व्यापाऱ्यांनी तो खरेदी करून शहरातील गल्ली बोळात हातगाड्याद्वारे घरोघरी विक्री करताना मात्र दुप्पट दर आकारून शंभर टक्के नफा मिळवित आहेत. मागील आठवड्यात १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे टोमॅटोला भाव मिळाला होता. त्यातुलनेत आता आवक कमी झाल्यामुळे भाववाढ झाली आहे. त्याचा फायदा किरकोळ व्यापारी घेत असल्याचे दिसून येत आहे.४५५ क्विंटल बटाट्याची आवक

कांदा व बटाट्याची सर्वाधिक आवक बाजार समितीत रोज होते. त्याची सर्वाधिक मागणीसुद्धा असते. बुधवारी ४५५ क्विंटल बटाट्यांची आवक झाली आहे. त्याला ६०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. गावरान कांद्याची आवक ५०५ क्विंटल, तर नाशिकच्या कांद्याची आवक २४५ क्विंटल झाल्याची माहिती फळ व भाजीबाजार विभागाने दिली आहे.

टॅग्स :vegetableभाज्या