शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांची तृष्णातृप्तीसाठी भटकंती

By गणेश वासनिक | Updated: May 6, 2024 12:38 IST

Amravati : तापमान उच्चांकाकडे; व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांकडे मात्र दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके तापदायक ठरू लागले आहेत. दुसरीकडे व्याघ्र प्रकल्प अथवा जंगलात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांना तृष्णातृप्तीसाठी भटकंती करावी लागत आहे.

दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने महिन्यातच यंदा जानेवारी वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी सूक्ष्म नियोजन करण्याबाबत निर्देश दिले होते. विशेषतः विदर्भात पारा सर्वाधिक राहत असल्याने व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी पाणवठ्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, विदर्भात एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी पावसाने नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यांमध्ये मुबलक पाणी होते. तथापि, मे महिना सुरू होताच व्याघ्र प्रकल्पांसह प्रादेशिक विभागाच्या जंगल क्षेत्रातील पाणवठ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. एकीकडे सूर्य आग ओकू लागला असताना, जंगल क्षेत्रातील ओढे, नाले, पाणवठ्यांमध्ये पाणी नसेल, तर वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी काय हाल होत असतील, याचा वनाधिकाऱ्यांनी विचार करणे काळाची गरज झाली आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांसंदर्भात राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो, असे म्हणत उत्तर देणे टाळले, हे विशेष.

टँकरने पाणीपुरवठा खरंच होतो का?व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यात पाणी समस्या उद्भवल्यास प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांचे आहेत. मात्र, व्याघ्र प्रकल्प वा जंगल क्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो का, याची तपासणी केल्यास बरेच घबाड बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लिटमस पेपर नाहीपाणवठ्यात विष प्रयोगाच्या तपासणीसाठी वन कर्मचाऱ्यांना लिटमस पेपरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट या चार वन्यजीव विभागांतील वन कर्मचाऱ्यांना पाणवठ्याच्या तपासणीसाठी लिटमस पेपर मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणवठ्यांवर तस्करांनी विषप्रयोग केल्यास वाघाच्या हत्येची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. वन्यजीव विभागातील कर्मचारी हतबल झाले असून, लिटमस पेपर नाही, पोशाख आणि संरक्षणासाठी शस्त्रे नाहीत, अशी माहिती आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाईTigerवाघleopardबिबट्या