शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांची तृष्णातृप्तीसाठी भटकंती

By गणेश वासनिक | Updated: May 6, 2024 12:38 IST

Amravati : तापमान उच्चांकाकडे; व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांकडे मात्र दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके तापदायक ठरू लागले आहेत. दुसरीकडे व्याघ्र प्रकल्प अथवा जंगलात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांना तृष्णातृप्तीसाठी भटकंती करावी लागत आहे.

दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने महिन्यातच यंदा जानेवारी वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी सूक्ष्म नियोजन करण्याबाबत निर्देश दिले होते. विशेषतः विदर्भात पारा सर्वाधिक राहत असल्याने व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी पाणवठ्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, विदर्भात एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी पावसाने नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यांमध्ये मुबलक पाणी होते. तथापि, मे महिना सुरू होताच व्याघ्र प्रकल्पांसह प्रादेशिक विभागाच्या जंगल क्षेत्रातील पाणवठ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. एकीकडे सूर्य आग ओकू लागला असताना, जंगल क्षेत्रातील ओढे, नाले, पाणवठ्यांमध्ये पाणी नसेल, तर वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी काय हाल होत असतील, याचा वनाधिकाऱ्यांनी विचार करणे काळाची गरज झाली आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांसंदर्भात राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो, असे म्हणत उत्तर देणे टाळले, हे विशेष.

टँकरने पाणीपुरवठा खरंच होतो का?व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यात पाणी समस्या उद्भवल्यास प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांचे आहेत. मात्र, व्याघ्र प्रकल्प वा जंगल क्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो का, याची तपासणी केल्यास बरेच घबाड बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लिटमस पेपर नाहीपाणवठ्यात विष प्रयोगाच्या तपासणीसाठी वन कर्मचाऱ्यांना लिटमस पेपरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट या चार वन्यजीव विभागांतील वन कर्मचाऱ्यांना पाणवठ्याच्या तपासणीसाठी लिटमस पेपर मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणवठ्यांवर तस्करांनी विषप्रयोग केल्यास वाघाच्या हत्येची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. वन्यजीव विभागातील कर्मचारी हतबल झाले असून, लिटमस पेपर नाही, पोशाख आणि संरक्षणासाठी शस्त्रे नाहीत, अशी माहिती आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाईTigerवाघleopardबिबट्या