शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वाघांनाही काेरोना संसर्गाचा धोका? हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 07:00 IST

Amravati news देश, विदेशात कोरोनाने कहर केल्यामुळे संपूर्ण मानवजात हैराण झाली आहे. मात्र, कोरोना संसर्ग हा वन्यजीवांना होऊ शकताे, असे संकेत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प अथवा राखीव संरक्षित वनातील वाघांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देवाघांच्या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे निर्देश

 गणेश वासनिक

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : देश, विदेशात कोरोनाने कहर केल्यामुळे संपूर्ण मानवजात हैराण झाली आहे. मात्र, कोरोना संसर्ग हा वन्यजीवांना होऊ शकताे, असे संकेत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प अथवा राखीव संरक्षित वनातील वाघांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघांच्या हालचाली मंदावताच त्याचे रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाचे आगमन झाले आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. सप्टेंबरमध्ये पर्यटक आणि वाघांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने एनटीसीएने गाईडलाईन जारी केले होते. ऑक्टाेबर ते डिसेंबर २०२० या दरम्यान व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. परंतु, कोरोनाचा नवीन वर्षात जानेवारीमध्ये पुन्हा उद्रेक झाला. त्यानंतर आजतागायत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पांना टाळे लावण्यात आले आहे. ऑगस्टनंतर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले होतील, अशी माहिती आहे. मात्र, वाघांची भूमी असलेल्या विदर्भात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे क्षेत्रीय वनकर्मचारी, अधिकारी यांना वाघांच्या हालचाली टिपण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ट्रॅप कॅमेऱ्यातून वाघांचा अधिवास, त्याच्या हालचाली, भक्षक आदींबाबतची अचूक माहिती ठेवण्याच्या सूचना एनटीसीएच्या आहेत. राज्यात पेंच, ताडोबा- अंधारी, नवेगाव-नागझिरा, मेळघाट व बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात, तर सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रात आहे.

भटकी श्वानांवर पाळत ठेवा

व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये असलेली भटकी श्वानांनी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करू नये, याची खबरदारी घेण्याचे वरिष्ठांनी कळविले आहे. अनावधानाने ही भटकी श्वान व्याघ्र प्रकल्पात शिरली आणि वाघाने त्याची शिकार केल्यास त्याच्यापासून वाघांना विषाणू अथवा जिवाणूचा धोका बळावण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्प अथवा अभयारण्यात भटकी श्वान जाऊ नये, याबाबत काळजी घेण्याचे सुचविले आहे.

वन्यजीवांची खबरदारी घेणे गरजेचे

राज्यात वन्यजीवांना कोरोनाची लागण झाली, असे आतापर्यंत एकही उदाहरण पुढे आले नाही. मात्र, ज्याप्रकारे कोरोनाने मनुष्यास वेठीस धरले, ते बघता वन्यजीवांची खबरदारी घेणे गरजेचे आहे. व्याघ्र प्रकल्प अथवा राखीव वनांत कर्मचारी, अधिकारी संक्रमित असल्यास त्याने वन्यजीवांच्या परिसरात राहू नये. वाघात अशी काही लक्षणे दिसून आल्यास विषाणूच नव्हे तर जिवाणूची तपासणी करता येईल. वाघांचे रक्ताचे नमुने घेऊन उपचार करता येते, असे जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी विजय राहाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

एनटीसीएचे पत्र प्राप्त झाले असून, वाघांच्या एकूणच हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश आहेत. क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रसंगी एखादा वाघ दोन ते तीन दिवसांपासून एकाच जागेवर बसून आढळल्यास त्याचे रक्ताचे नमुने पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणीसाठी पाठविण्याचे कळविण्यात आले आहे.

- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम विभाग (मुंबई)

टॅग्स :Tigerवाघ