शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

कुणाची आई तर कुणाचे वडील हिरावले, सर्पदंशाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 11:06 IST

इर्विनमध्ये नातेवाईकांचा आकांत, आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या तीन रुग्णांचा एकाच वेळी मृत्यू

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा मंगळवारी एकाच वेळी मृत्यू झाला. त्यामुळे तिन्ही रुग्णांच्या नातेवाईकांचा रडण्याचा आकांत पाहून अनेकांच्या काळजाला यावेळी पाझर फुटला होता. या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये बालक युवने (५०, रा. वावरुडी पो.स्टे., बेनोडा) आणि आशा कांबळे (४५, रा. नांदगावपेठ) या दोघांना सर्पदंश झाला होता. तर अनिल इंगळे (५०, रा. ब्राम्हणवाडा गोविंदपूर, ता. अमरावती) यांचा हृदयविकाराने निधन झाले.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होते. सर्पदंशामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. असाच काहीसा प्रसंग मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू विभागात घडला. दोन वेगवेगळ्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये कोणी आपली आई तर कोणी आपले वडील गमावले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार बालक युवने यांना सर्पदंश झाल्याने २५ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची गंभीर प्रकृती लक्षात घेता त्यांना तातडीने आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते.

आठ दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते; परंतु, अखेर त्यांची ही झुंज कायमची संपली. तर आशा कांबळे यांना १ ऑगस्टला सकाळी घरातच सर्पदंश झाल्याने त्यांना तातडीने इर्विनमध्ये दाखल केले होते. त्याच्यावरही आयसीयूमध्ये उपचार सुरू होते; परंतु, त्यांचीही दुपारी प्राणज्योत मावळली. तर हृदयविकाराचा झटका आलेल्या अनिल इंगळे यांचाही आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तीनही रुग्णांची शेकडोच्या संख्येत नातेवाईक यावेळी रुग्णालयात पोहाेचले होते.

सहा महिन्यांत ५६९ नागरिकांना सर्पदंश

जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ५६९ नागरिकांना सर्पदंश झाला. यातील ३४४ रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूsnakeसापAmravatiअमरावती