शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:12 IST

सावरखेड पिंगळाई या गावात गेल्या एक वर्षात चौथी शेतकऱ्याची आत्महत्या आहे.

अमरावती : जिल्ह्यात ८ ऑक्टोबरपासून सलग दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यांपैकी मोर्शी तालुक्यात दोघांनी आत्महत्या केली, तर चांदूर बाजार तालुक्यातील एका शेतकऱ्याने जीवन संपविले.

मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथील प्रवीण रामकृष्ण हरणे (३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून ८ ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील आहेत. ९ ऑक्टोबर रोजी सावरखेड पिंगळाई येथील युवा शेतकरी गोपाल मुकुंदराव तायडे (५०) या शेतकऱ्याने कर्जापायी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे मौजा सावरखेड पिंगळाई शिवारात दहा एकर शेती आहे. त्या शेतात त्यांनी कपाशी व सोयाबीनचे पीक पेरले होते. शेती उभी करण्यासाठी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते. ९ ऑक्टोबर रोजी ते शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी गेले होते. तेथेच सकाळी आठ वाजता दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, मुलगा आहे. मोठी मुलगी ही सावरखेड पिंगळाई गावची उपसरपंच आहे. गावात त्यांची चांगली प्रतिष्ठा होती. सावरखेड पिंगळाई या गावात गेल्या एक वर्षात चौथी शेतकऱ्याची आत्महत्या आहे.

चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून सोमवारी दुपारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ऋषिकेश नंदकुमार पारधी (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ऋषिकेश हा इलेक्ट्रिकल दुरुस्तीचे दुकान चालवीत होता; तसेच वडिलांच्या नावे असलेली ३८ आर शेती वाहत होता. त्यावर वडिलांच्या नावे चुकविता न आलेले कर्ज होते. या कर्जफेडीच्या विवंचनेला कंटाळून ९ ऑक्टोबर रोजी त्याने पेठपुरास्थित भाड्याच्या दुकानात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अविवाहित असलेला ऋषिकेश हा कुटुंबातील एकुलता कमावता होता. त्याच्या पश्चात ६२ वर्षीय आई, धाकटा भाऊ व दोन बहिणी आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूAmravatiअमरावती