शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ची १६ हजार कामे, तरीही शिवार कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:16 IST

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात चार वर्षांत १६ हजार ४८२ कामे झालीत. पिकांना ऐनवेळी पाणी मिळावे व परिसराचा जलस्तर वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र, या चारही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कामाची उपयोगिता सिद्ध झालेली नाही.

ठळक मुद्दे३५० कोटींचा निधी पाझरला कुठे ? : एका गावावर सरासरी सात ते ५१ लाखांचा खर्च, कामात पाणी मुरलेच नाही

गजानन मोहोड। लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात चार वर्षांत १६ हजार ४८२ कामे झालीत. पिकांना ऐनवेळी पाणी मिळावे व परिसराचा जलस्तर वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र, या चारही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कामाची उपयोगिता सिद्ध झालेली नाही. भूजलसाठी निधी पाझरला. मात्र, पाणी मुरलेच नाही. आज ही सर्व कामे तहानली आहे. त्यामुळे एका गावावर साधारणत: ७ ते ५२ लाखांचा खर्च झाला असताना शिवाराला कोरड लागल्याचे वास्तव आहे.दरवर्षीच सरासरीपेक्षा कमी पाऊस व दुष्काळ व नापिकीचे संकट जिल्ह्यावर ओढावत असल्याने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतशिवार हिरवेगार करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना निश्चितच चांगली आहे. मात्र, या अभियानाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आणि शिवार कोरडेच राहिले. कागदावर मात्र, ८३,११६ टीएमसी साठा निर्माण झाला. मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना बीड, परळी आदी भागांतील यंत्रसामग्री जिल्ह्यात कामासाठी आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना जलयुक्तच्या उल्लेखनीय कामासाठी पंतप्रधानांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचवर्षी जिल्ह्यातील भूजलपातळीत पाच मीटरपर्यंत घट झाली. जिल्ह्यात सन २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत तब्बल १,०५२ गावांमध्ये कामे करण्यात आली. यावर आतापर्यंत ३५० कोटींचा खर्च राज्य शासनाच्या १५ यंत्रणांनी केला. या कामांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचन करता आले, असे उदाहरण अजून प्रशासनाने समोर आणलेले नाही. त्यामुळे जलयुक्तमुळे केवळ राबविणाऱ्या यंत्रणांचेच शिवार हिरवे झाले. शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ‘एनडीआरएफ’चा दुष्काळ निधी आला, हिच जलयुक्तची शोकांतिका अन् जिल्ह्याचे वास्तव आहे.शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्याने ड्रिम प्रोजेक्टच्या कामांची चौकशी मुख्यमंत्र्यांनाच लावावी लागली. सन २०१९-२० साठी जलयुक्तचा काहिही गाजावाजा नाही. आता केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाद्वारा आता ‘जलशक्ती अभियान’ १ जुलैपासून सुरू करण्यात आले. यामध्ये अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक भूजलस्तर खालावलेल्या मोर्शी, वरूड, अचलपूर व चांदूर बाजार या चार तालुक्यांत समावेश करण्यात आला. जलसंधारणासाठी आता पंचसूत्रीचा उतारा केंद्रीय सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा यांनी दिला आहे. यासाठी अद्यापही निधीची वानवा आहे. त्यामुळे जनजागृतीतून जलजागृतीवर भर दिला जात आहे.चार वर्षांत ७१,४७७ हेक्टर सिंचन कुठे?चार वर्षांत जलयुक्तच्या १६,४६२ कामांमुळे किमान ८३ हजार ११६ टीएमसी जलसाठा निर्माण झाल्याचा जिल्हाधिकाºयांच्या अहवालात नमूद आहे. विशेष म्हणजे हा अहवाल मुख्यमंत्र्यांनाच सादर करण्यात आलेला आहे. जलयुक्तच्या कामामुंळे निर्माण झालेल्या पाणीसाठ्यातून पिकांना एकवेळ पाण्याची पाळी दिल्यास किमान ७१ हजार ४७७ हेक्टरमध्ये सिंचन करता येते, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरवर्षी पावसाअभावी दुष्काळ ओढावला असताना जलयुक्तमुळे ‘सुजलाम्, सूफलाम्’ झालेला शेतकरी समोर आलेला नाही.७५८ गावे जलपरिपूर्ण कशी?जिल्ह्यात सन २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत ७५८ गावांमध्ये जलयुक्त शिवार हे राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले. यामध्ये १६ हजार १८८ कामे मंजूर झाली. यापैकी १६ हजार १४२ कामे पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाचा आहे. यामुळे ७५८ गावे जलपरिपूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यावर ३१८ कोटी ७८ लाखांचा निधी खर्च झाला. यंदा २९४ गावांमध्ये कामे करण्यात आलीत. यातील १८५ कामे परिपूर्ण झाल्याने गावे जलपरिपूर्ण झाल्याचा यंत्रणेचा दावा किती खरा आहे, हे यंदाच्या स्थितीवरून दिसून येत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार