शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कापूस गाडीमागे हजारांची लूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:02 IST

शासनाने यावर्षी हमीभावाने शासकीय कापूस खरेदीला ३ डिसेंबरपासून सुरुवात केली. तालुक्यात शासनाने आतापर्यंत ४ हजार ५०० वाहनांतून १ लाख ६० क्विंटल कापूस खरेदी केला. अंजनगाव सूर्जी तालुक्यात चार खासगी जिनिंग प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदी होत आहे. बाजार समितीत वाहन लावण्यापासून ते खाली करण्यापर्यंत शेतकऱ्याला पैसे मोजावे लागतात. या गोरखधंद्यात शेतकरी नाडवला जात आहे.

ठळक मुद्देबाजार समितीतील प्रकार : प्रशासनाची अळीमिळी गुपचिळी

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : राज्य शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन डिसेंबर महिन्यात शासकीय कापूस खरेदी सुरू केली. परंतु यात शेतकऱ्यांची प्रचंड लूट होताना दिसून आहे. यात मापाई, उतराई व हलका कापूस संबोधून प्रतिक्विंटल ५०० ती १ हजार रुपयांनी शेतकऱ्यांना गंडविले जात आहे.शासनाने यावर्षी हमीभावाने शासकीय कापूस खरेदीला ३ डिसेंबरपासून सुरुवात केली. तालुक्यात शासनाने आतापर्यंत ४ हजार ५०० वाहनांतून १ लाख ६० क्विंटल कापूस खरेदी केला. अंजनगाव सूर्जी तालुक्यात चार खासगी जिनिंग प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदी होत आहे. बाजार समितीत वाहन लावण्यापासून ते खाली करण्यापर्यंत शेतकऱ्याला पैसे मोजावे लागतात. या गोरखधंद्यात शेतकरी नाडवला जात आहे. यासंदर्भात सर्वप्रथम बाजार समितीचे सचिव गजानन नवघरे यांना मापाई आणि तोलाईचे शासकीय भाव विचारले असता त्यांनी आम्हाला स्पष्ट माहिती नसल्याचे सांगितले. कापूस उत्पादक महासंघाचे सरव्यवस्थापक जयेश महाजन यांना मापाई आणि तोलाई संदर्भातील नियमांबाबत विचारणा केली असता त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अंगुलीनिर्देश केला. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांना विचारणा केली असता, माझ्या स्तरावर याची माहिती नसून फेडरेशनला विचारा, असे त्यांनी सांगितले.राज्य कापूस पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक डी. यू. कांबळे यांचेशी संपर्क केला असता, बाजार समितीला माहिती विचारा, अशी टोलवाटोलवी करण्यात आली. कापूस खरेदी ते गाठी तयार करण्यापर्यंतची जबाबदारी जिनींग प्रेसिंगची आहे. यासंदर्भात तालुका सहायक निबंधकाकडे तक्रार करण्यास सांगितले. जिनिंग मालक, खरेदीदार, काटा तपासणी प्रमाणपत्र याचा फलक कापूस खरेदी केंद्रावर लावणे बंधनकारक आहे. मात्र तसे फलकही कुठे आढळून येत नाही.मनमानी वसुलीमहाराष्ट्र शासन खरेदी करीत असलेल्या लाखो क्विंटल कापूस खरेदी संदर्भात शासनाचे कुठेही नियम ठरले नसून शेतकºयांकडून प्रत्येक वाहनामागे तोलाई ४० ते ५० रुपये, उतराईसाठी ४५० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत रक्कम घेतली जाते. परंतु यासंदर्भात शासनाचे दरपत्रक नसल्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे दिसून येत आहे. डी.यू. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात शासनाकडून कुठलेही निर्देश नाहीत. त्यामुळे शासकीय कापूस खरेदीत कोट्यवधींची काळी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. यात जिनिंग प्रेसिंग लॉबी, स्थानिक कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत अनेकांची मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड