शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

हजारो क्विंटल शेतमाल पावसात भिजला

By admin | Updated: March 2, 2015 00:31 IST

शनिवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या सुसाट वादळासह पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हजारो पोते धान्य भिजले.

इंदल चव्हाण अमरावतीशनिवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या सुसाट वादळासह पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हजारो पोते धान्य भिजले. यात तूर, सोयाबीन, हरभरा व इतर धान्याचे प्रचंड नुकसान झाले. याचा फटका शेतकऱ्यांंना बसला आहे. यावर्षी अल्प पावसामुळे कृषिमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाले नाही. त्यातच दर अत्यल्प असल्यामुळे मालाची मागील वर्षीच्या तुलनेत आवक कमीच आहे. मात्र शेतकरी आधीच डबघाईस आलेला असताना शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे जेमतेम विक्रीसाठी आणलेला कृषिमाल ओला झाल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तूर, सोयाबीन व हरभऱ्याची आवक आहे. यामध्ये तुरीची दररोज २ ते ४ हजार क्विंटल, हरभरा १०० ते २०० क्विंटल व सोयाबीन ५०० ते ७०० क्विंटलची आवक होत आहे. येथे सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आवक स्वीकारली जाते व खरेदीचे व्यवहार दुपारी ४ वाजेपर्यंत संपुष्टात येते. त्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कृषिमाल ते आपल्या नियोजनानुसार थप्पी लावून ठेवतात; मात्र शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन ६ वाजतापासून विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यामध्ये व्यापाऱ्यांची वेळेवर योग्य उपाययोजना करताना तारांबळ उडाली. तासभर तुफान वादळामुळे मालावरील ताडपत्री उडाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापारांनासुद्धा बसला आहे. दरम्यान काही गंजींवर ताडपत्री पडली तर काही गंजी उघड्यावरच राहिल्यात. त्यामुळे जवळपास २ हजार धान्याचे पोते पावसात भिजल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ताडपत्रीची व्यवस्था नाहीशुक्रवारी माल विक्रीला आणला होता. विक्री झाली नसल्यामुळे बाजार समिती आवारात ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नियोजन करण्यासाठी धावपळ करावी लागली. कमिटीकडे ताडपत्री मागण्याकरिता गेलो असता संपल्याचे उत्तर मिळाले. काही ताडपत्र्या फाटल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वेळेवर तडजोड होऊ शकली नाही. पणिामी १४ पोते चना पाण्यात ओला झाला. यामध्ये जवळपास ७० हजारांचे नुकसान झाल्याचे वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकरीसुनील बुरघाटे यांनी सांगितले.बॉक्सकमिटीने व्यवस्था करायला हवीबाजार समितीचा अवाढव्य व्याप बघता येथे आपात्कालीन परिस्थतीत योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने कमिटीतर्फे व्यवस्था व्हायला हवी. शेतकरी शेतातून आणलेला माल जिवापाड जपतात. माल घरी असताना अशा संकटांचा सामना करताना वाटेल ती उपाययोजना करतात. तेव्हा त्यांचे 'सोर्स' असतात. मात्र बाजार समितीत माल आणल्यानंतर त्याची व्यवस्था करताना त्यांना उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून सुविधा मिळणे गरजेचे आहे, असे मत आडते मनोज राठी यांनी व्यक्त केले.