शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल शेतमाल पावसात भिजला

By admin | Updated: March 2, 2015 00:31 IST

शनिवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या सुसाट वादळासह पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हजारो पोते धान्य भिजले.

इंदल चव्हाण अमरावतीशनिवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या सुसाट वादळासह पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हजारो पोते धान्य भिजले. यात तूर, सोयाबीन, हरभरा व इतर धान्याचे प्रचंड नुकसान झाले. याचा फटका शेतकऱ्यांंना बसला आहे. यावर्षी अल्प पावसामुळे कृषिमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाले नाही. त्यातच दर अत्यल्प असल्यामुळे मालाची मागील वर्षीच्या तुलनेत आवक कमीच आहे. मात्र शेतकरी आधीच डबघाईस आलेला असताना शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे जेमतेम विक्रीसाठी आणलेला कृषिमाल ओला झाल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तूर, सोयाबीन व हरभऱ्याची आवक आहे. यामध्ये तुरीची दररोज २ ते ४ हजार क्विंटल, हरभरा १०० ते २०० क्विंटल व सोयाबीन ५०० ते ७०० क्विंटलची आवक होत आहे. येथे सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आवक स्वीकारली जाते व खरेदीचे व्यवहार दुपारी ४ वाजेपर्यंत संपुष्टात येते. त्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कृषिमाल ते आपल्या नियोजनानुसार थप्पी लावून ठेवतात; मात्र शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन ६ वाजतापासून विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यामध्ये व्यापाऱ्यांची वेळेवर योग्य उपाययोजना करताना तारांबळ उडाली. तासभर तुफान वादळामुळे मालावरील ताडपत्री उडाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापारांनासुद्धा बसला आहे. दरम्यान काही गंजींवर ताडपत्री पडली तर काही गंजी उघड्यावरच राहिल्यात. त्यामुळे जवळपास २ हजार धान्याचे पोते पावसात भिजल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ताडपत्रीची व्यवस्था नाहीशुक्रवारी माल विक्रीला आणला होता. विक्री झाली नसल्यामुळे बाजार समिती आवारात ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नियोजन करण्यासाठी धावपळ करावी लागली. कमिटीकडे ताडपत्री मागण्याकरिता गेलो असता संपल्याचे उत्तर मिळाले. काही ताडपत्र्या फाटल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वेळेवर तडजोड होऊ शकली नाही. पणिामी १४ पोते चना पाण्यात ओला झाला. यामध्ये जवळपास ७० हजारांचे नुकसान झाल्याचे वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकरीसुनील बुरघाटे यांनी सांगितले.बॉक्सकमिटीने व्यवस्था करायला हवीबाजार समितीचा अवाढव्य व्याप बघता येथे आपात्कालीन परिस्थतीत योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने कमिटीतर्फे व्यवस्था व्हायला हवी. शेतकरी शेतातून आणलेला माल जिवापाड जपतात. माल घरी असताना अशा संकटांचा सामना करताना वाटेल ती उपाययोजना करतात. तेव्हा त्यांचे 'सोर्स' असतात. मात्र बाजार समितीत माल आणल्यानंतर त्याची व्यवस्था करताना त्यांना उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून सुविधा मिळणे गरजेचे आहे, असे मत आडते मनोज राठी यांनी व्यक्त केले.