शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
7
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
8
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
9
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
10
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
11
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
12
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
13
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
14
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
15
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
16
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
17
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
18
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
19
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
20
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल शेतमाल पावसात भिजला

By admin | Updated: March 2, 2015 00:31 IST

शनिवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या सुसाट वादळासह पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हजारो पोते धान्य भिजले.

इंदल चव्हाण अमरावतीशनिवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या सुसाट वादळासह पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हजारो पोते धान्य भिजले. यात तूर, सोयाबीन, हरभरा व इतर धान्याचे प्रचंड नुकसान झाले. याचा फटका शेतकऱ्यांंना बसला आहे. यावर्षी अल्प पावसामुळे कृषिमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाले नाही. त्यातच दर अत्यल्प असल्यामुळे मालाची मागील वर्षीच्या तुलनेत आवक कमीच आहे. मात्र शेतकरी आधीच डबघाईस आलेला असताना शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे जेमतेम विक्रीसाठी आणलेला कृषिमाल ओला झाल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तूर, सोयाबीन व हरभऱ्याची आवक आहे. यामध्ये तुरीची दररोज २ ते ४ हजार क्विंटल, हरभरा १०० ते २०० क्विंटल व सोयाबीन ५०० ते ७०० क्विंटलची आवक होत आहे. येथे सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आवक स्वीकारली जाते व खरेदीचे व्यवहार दुपारी ४ वाजेपर्यंत संपुष्टात येते. त्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कृषिमाल ते आपल्या नियोजनानुसार थप्पी लावून ठेवतात; मात्र शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन ६ वाजतापासून विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यामध्ये व्यापाऱ्यांची वेळेवर योग्य उपाययोजना करताना तारांबळ उडाली. तासभर तुफान वादळामुळे मालावरील ताडपत्री उडाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापारांनासुद्धा बसला आहे. दरम्यान काही गंजींवर ताडपत्री पडली तर काही गंजी उघड्यावरच राहिल्यात. त्यामुळे जवळपास २ हजार धान्याचे पोते पावसात भिजल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ताडपत्रीची व्यवस्था नाहीशुक्रवारी माल विक्रीला आणला होता. विक्री झाली नसल्यामुळे बाजार समिती आवारात ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नियोजन करण्यासाठी धावपळ करावी लागली. कमिटीकडे ताडपत्री मागण्याकरिता गेलो असता संपल्याचे उत्तर मिळाले. काही ताडपत्र्या फाटल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वेळेवर तडजोड होऊ शकली नाही. पणिामी १४ पोते चना पाण्यात ओला झाला. यामध्ये जवळपास ७० हजारांचे नुकसान झाल्याचे वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकरीसुनील बुरघाटे यांनी सांगितले.बॉक्सकमिटीने व्यवस्था करायला हवीबाजार समितीचा अवाढव्य व्याप बघता येथे आपात्कालीन परिस्थतीत योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने कमिटीतर्फे व्यवस्था व्हायला हवी. शेतकरी शेतातून आणलेला माल जिवापाड जपतात. माल घरी असताना अशा संकटांचा सामना करताना वाटेल ती उपाययोजना करतात. तेव्हा त्यांचे 'सोर्स' असतात. मात्र बाजार समितीत माल आणल्यानंतर त्याची व्यवस्था करताना त्यांना उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून सुविधा मिळणे गरजेचे आहे, असे मत आडते मनोज राठी यांनी व्यक्त केले.