शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

तू ये रे पावसा... कपाशीच्या बुडाशी चक्क अ‍ॅक्वाचं पाणी देतोय बळीराजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 19:53 IST

शेतकऱ्यांचा आटापिटा : पीक वाचविण्यासाठी धडपड 

अमरावती : एकरी १२ हजार रुपये भाडे देऊन मक्त्याने कसण्यासाठी घेतलेल्या शेतात कपाशीचे पीक जगविण्यासाठी आष्टी येथील दिव्यांग शेतकरी अ‍ॅक्वाचे स्वच्छ पाणी रोपांना देत आहे. गतवर्षी याच शेतात २७ क्विंटल कपाशीचे उत्पादन घेतले; यंदा हे पीक पाणी येईपर्यंत जगले तरी खूप मिळविल्यासारखे होईल, असे हतबल होऊन या शेतकऱ्याने म्हटले. त्याच्या या प्रतिक्रियेतूनच अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील यंदाच्या पाऊसमानाच्या भीषण परिस्थितीचा प्रत्यय येत आहे. 

आष्टी (ता. अमरावती) येथील अल्पभूधारक शेतकरी नीलेश एकनाथराव ढोरे (३३) दिव्यांग आहेत. स्वत:च्या दीड एकर शेतात आई, पत्नी, चार वर्षाचा मुलगा यांची गुजराण शक्य नसल्याने गावालगतची तीन एकर शेती भाड्याने घेऊन तो कसत आहे. यंदा या जमिनीत कपाशीचा पेरा करण्यात आला. भाड्यापोटी एकरकमी ३६ हजार आणि बियाणे, पेरणी व मशागतीचे आठ हजार असे ४४ हजार रुपये आधीच शेत-माऊलीच्या उदरात टाकणाऱ्या नीलेशची पावसाने खोडा टाकताच जमिनीतून वर आलेले पीक जगविण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. 

अमरावती शहरापासून २६ किमी अंतरावर असलेले आष्टी परिसर हा खारपाणपट्ट्याचा. त्यामुळे सिंचनाची सुविधाच नाही. त्यात जास्त पाणी झाल्यास जमीन चिबड होते. याशिवाय पाण्यात क्षार असल्याने ओलीत केल्यास जमीन क्षारपड होण्याचा धोका आहे. त्यामुळे घरी असलेल्या अ‍ॅक्वा उद्योगात तयार झालेले पाणी शेतात नेऊन पिकांना देण्याची कल्पना नीलेश ढोरे यांनी प्रत्यक्षात आणली. कपाशीला तीन चाकांची सुविधा असलेल्या दुचाकीवर कॅन चढवून त्यांच्यासह पत्नी डिंपल पाणी देत आहेत, तर कधी नातेवाइकाच्या ट्रॅक्टरवर टाकी चढवून पाइपने प्रत्येक रोपाच्या बुडाशी पाणी देण्यात येते. अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पावसाची प्रतीक्षा होत आहे. ज्यांना शक्य आहे, ते स्प्रिंकलर व इतर मार्गाने सिंचनातून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांना नशिबाचा हवाला देत स्वस्थ बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. भीषण दुष्काळातच आता दिवसा उन्हाचे चटकेही वाढले आहेत. 

पाऊस ७ जुलैपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तेव्हापासून रोपांना पाणी देण्याचे काम करीत आहे. पावसाळा पुन्हा सुरू होईपर्यंत या रोपांनी पावसाचा ताण सहन केला तरी दुबार पेरणीचा खर्च टळेल, असे भावनिक उद्गार निलेश यांनी काढले.  - निलेश ढोरे, आष्टी, ता. अमरावती. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीRainपाऊसamravati-acअमरावती