शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निधी नाही, योजनांनाही कात्री कशी मिळणार विकासाची खात्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:18 IST

कामे ठप्प : कृषी, समाजकल्याण, पशुसंवर्धन विभाग नामधारी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेतील समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन या विभागांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गत काही वर्षांत या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना टप्प्याटप्प्याने बंद केल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे दोन चार योजनाच शिल्लक आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सध्या दलितवस्ती सुधार योजनेशिवाय अन्य फारशी कामे नाहीत. योजनेची बहुतांश उद्दिष्ट्येही पूर्ण झाल्याने अनेकदा निधी परत गेला आहे. या कार्यालयात जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांची संख्याही नाही बरोबर आहे. ज्येष्ठ कलाकारांना निवृत्तीवेतन योजनेची जबाबदारी या विभागाकडून काढून पंचायत विभागाकडे दिली. डेप्युटी सीईओ संवर्गाने ती अद्याप स्वीकारली नसल्याने तिचे अडचणी कायम आहेत. 

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजना पाच कोटींपर्यतच मर्यादित आहेत. त्यापेक्षा जास्त खर्चाच्या योजना मजीप्राकडे जातात. ग्रामीण विकास यंत्रणेचे कामकाजही स्वतंत्र आहे. वित्त आयोगापासूनही जिल्हा परिषदेला दूरच ठेवले आहे. सर्व निधी थेट ग्रामपंचायतींना जातो. पदाधिकाऱ्यांच्या अवघ्या १० टक्के वाट्यावर समाधान मानावे लागत आहे. जिल्हा परिषदेचे स्वतःचे अंदाजपत्रक २५ कोटींच्या आतच आहे. उर्वरित सर्व निधी नियोजन समिती, आमदार खासदार निधी किंवा अन्य मार्गांनीच मिळवावा लागतो. या स्थितीत जिल्हा परिषदेला निधी नाही. त्यातच योजनांनाही कात्री, परिणामी कशी मिळणार विकासकामांची खात्री, अशी गत मिनी मंत्रालयाची झाली आहे.

पशुसंवर्धन, कृषीची अवस्थाही वाईटजिल्हा परिषदेतील कृषी आणि पशुसंवर्धन विभागांची परिस्थितीही बिकट आहे. पुरेशा योजना नाहीत, त्यामुळे निधीही नाही अशी परिस्थिती या विभागाची आहे. कृषी विभागाच्या बहुतांश योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे सोपविल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील कृषी विभागात सध्या सन्नाटा असतो.

बांधकाम विभागही त्याच मार्गावरजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची वाटचालही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाले आहेत. आमदार, खासदारांनाही आपल्या निधीतील कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करून घेण्यात कल नाही.

शासनाने बळ देण्याची आवश्यकता"गत दहा वर्षांत जिल्हा परिषदेचे महत्त्व कमी करण्याचे काम सुरू आहे. सदस्य होण्याऐवजी गावाचा सरपंच होणे चांगले, अशी मानसिकता तयार झाली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा गाडा सुरळीत ठेवण्यासाठी जि.प.ला शासनाने बळ देण्याची गरज आहे."- बाळासाहेब भागवत, माजी उपाध्यक्ष, जि.प.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती