शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
6
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
7
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
8
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
9
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
10
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
11
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
12
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
13
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
14
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
15
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
16
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
17
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
18
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
19
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
20
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

खड्ड्यांचा पत्ता नाही, वृक्ष लागवड केव्हा? अभिसरणमुळे वन विभागाचे 'कल्याण'

By गणेश वासनिक | Updated: June 24, 2025 15:47 IST

Amravati : दहा कोटी वृक्ष लावगडीचे नियोजन शून्य, वन विभागाला अभिसरण रोहयोतून राबविण्याचे निर्देश

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करायची आहे. त्याकरिता विविध विभागावर जबाबदारी सोपवली आहे. वन विभाग वगळता अन्य विभागाला राज्य निधी मिळणार आहे. पावसाळा सुरू झाला असताना कुठेच खड्डे खोदण्यात आले नाही. त्यामुळे वृक्ष लागवड केव्हा करणार हा प्रश्न यंत्रणेपुढे कायम आहे. एकंदरीत वन विभागाचे अभिसरण योजनेमुळे 'कल्याण’ होणार असल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हरित समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी २६ विभागांना १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यात सर्वाधिक ४ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट रेशीम विभागाला देत वन विभागाने आपल्या अंगावरील घोगडं झटकले आहे. खरे तर १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहजतेने वन विभाग पूर्ण करू शकले असते. मात्र, आयएफएस लॉबीने केवळ दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट का घेतले, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र हे दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट अभिसरण योजनेतून पूर्ण करायचे असल्याने अद्यापही खड्डे खोदण्याचे काम ठप्प आहे, हेच सर्वदूर चित्र आहे. 

वन विभागात के.के. पुन्हा सक्रियवन विभागात के.के. पुन्हा सक्रिय झाले असून, वन सचिवांची दिशाभूल करून वन विभागात रोहयो आणि अभिसरण योजनेतून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे ठरविले आहे. या निर्णयाला सध्या वन विभागात विरोध होत असून, मुख्यमंत्र्यांचे हरित महाराष्ट्राचे स्वप्न तर भंगणार नाही ना? असे दिसून येत आहे. इतर विभाग वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हे राज्य योजना निधीतून करत असताना वन विभागाला मात्र अभिसरण योजनेतून दोन कोटी वृक्ष लागवडीचा अट्टाहास के.के. यांनी चालविला आहे.

मंत्रालयातून अभिसरण योजनेवर शिक्कामोर्तब२६ विभागांकडे १० कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट देताना वन विभाग वगळता अन्य विभागांना राज्य योजनेतून निधी मिळणार आहे. वृक्ष लागवडीचे टार्गेट पूर्ण करताना राज्य योजनेतून वन विभागाला डावलले आहे. नियोजन विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली नायर यांनी १९ जून रोजी परिपत्रक जारी करून वन विभागाने दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट अभिसरण योजनेतून करावे, असे स्पष्ट केले आहे. त्याकरिता ग्रामपंचायतीतून मजुरांची मागणी, आराखडा तयार करावा, असे नमूद आहे.

ग्रामीण भागात शेती कामे, मजूर मिळेनासध्या पावसाळा सुरू झाला असून, शेती कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी २७२ रुपये दराने ग्रामीण भागात मजूरउपलब्ध होईल का? असा सवाल वन कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वन विभागात तूर्त वृक्ष लागवडीचे नियोजन ढेपाळल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभाग