शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचा पत्ता नाही, वृक्ष लागवड केव्हा? अभिसरणमुळे वन विभागाचे 'कल्याण'

By गणेश वासनिक | Updated: June 24, 2025 15:47 IST

Amravati : दहा कोटी वृक्ष लावगडीचे नियोजन शून्य, वन विभागाला अभिसरण रोहयोतून राबविण्याचे निर्देश

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करायची आहे. त्याकरिता विविध विभागावर जबाबदारी सोपवली आहे. वन विभाग वगळता अन्य विभागाला राज्य निधी मिळणार आहे. पावसाळा सुरू झाला असताना कुठेच खड्डे खोदण्यात आले नाही. त्यामुळे वृक्ष लागवड केव्हा करणार हा प्रश्न यंत्रणेपुढे कायम आहे. एकंदरीत वन विभागाचे अभिसरण योजनेमुळे 'कल्याण’ होणार असल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हरित समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी २६ विभागांना १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यात सर्वाधिक ४ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट रेशीम विभागाला देत वन विभागाने आपल्या अंगावरील घोगडं झटकले आहे. खरे तर १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहजतेने वन विभाग पूर्ण करू शकले असते. मात्र, आयएफएस लॉबीने केवळ दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट का घेतले, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र हे दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट अभिसरण योजनेतून पूर्ण करायचे असल्याने अद्यापही खड्डे खोदण्याचे काम ठप्प आहे, हेच सर्वदूर चित्र आहे. 

वन विभागात के.के. पुन्हा सक्रियवन विभागात के.के. पुन्हा सक्रिय झाले असून, वन सचिवांची दिशाभूल करून वन विभागात रोहयो आणि अभिसरण योजनेतून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे ठरविले आहे. या निर्णयाला सध्या वन विभागात विरोध होत असून, मुख्यमंत्र्यांचे हरित महाराष्ट्राचे स्वप्न तर भंगणार नाही ना? असे दिसून येत आहे. इतर विभाग वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हे राज्य योजना निधीतून करत असताना वन विभागाला मात्र अभिसरण योजनेतून दोन कोटी वृक्ष लागवडीचा अट्टाहास के.के. यांनी चालविला आहे.

मंत्रालयातून अभिसरण योजनेवर शिक्कामोर्तब२६ विभागांकडे १० कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट देताना वन विभाग वगळता अन्य विभागांना राज्य योजनेतून निधी मिळणार आहे. वृक्ष लागवडीचे टार्गेट पूर्ण करताना राज्य योजनेतून वन विभागाला डावलले आहे. नियोजन विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली नायर यांनी १९ जून रोजी परिपत्रक जारी करून वन विभागाने दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट अभिसरण योजनेतून करावे, असे स्पष्ट केले आहे. त्याकरिता ग्रामपंचायतीतून मजुरांची मागणी, आराखडा तयार करावा, असे नमूद आहे.

ग्रामीण भागात शेती कामे, मजूर मिळेनासध्या पावसाळा सुरू झाला असून, शेती कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी २७२ रुपये दराने ग्रामीण भागात मजूरउपलब्ध होईल का? असा सवाल वन कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वन विभागात तूर्त वृक्ष लागवडीचे नियोजन ढेपाळल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभाग