शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

खड्ड्यांचा पत्ता नाही, वृक्ष लागवड केव्हा? अभिसरणमुळे वन विभागाचे 'कल्याण'

By गणेश वासनिक | Updated: June 24, 2025 15:47 IST

Amravati : दहा कोटी वृक्ष लावगडीचे नियोजन शून्य, वन विभागाला अभिसरण रोहयोतून राबविण्याचे निर्देश

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करायची आहे. त्याकरिता विविध विभागावर जबाबदारी सोपवली आहे. वन विभाग वगळता अन्य विभागाला राज्य निधी मिळणार आहे. पावसाळा सुरू झाला असताना कुठेच खड्डे खोदण्यात आले नाही. त्यामुळे वृक्ष लागवड केव्हा करणार हा प्रश्न यंत्रणेपुढे कायम आहे. एकंदरीत वन विभागाचे अभिसरण योजनेमुळे 'कल्याण’ होणार असल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हरित समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी २६ विभागांना १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यात सर्वाधिक ४ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट रेशीम विभागाला देत वन विभागाने आपल्या अंगावरील घोगडं झटकले आहे. खरे तर १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहजतेने वन विभाग पूर्ण करू शकले असते. मात्र, आयएफएस लॉबीने केवळ दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट का घेतले, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र हे दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट अभिसरण योजनेतून पूर्ण करायचे असल्याने अद्यापही खड्डे खोदण्याचे काम ठप्प आहे, हेच सर्वदूर चित्र आहे. 

वन विभागात के.के. पुन्हा सक्रियवन विभागात के.के. पुन्हा सक्रिय झाले असून, वन सचिवांची दिशाभूल करून वन विभागात रोहयो आणि अभिसरण योजनेतून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे ठरविले आहे. या निर्णयाला सध्या वन विभागात विरोध होत असून, मुख्यमंत्र्यांचे हरित महाराष्ट्राचे स्वप्न तर भंगणार नाही ना? असे दिसून येत आहे. इतर विभाग वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हे राज्य योजना निधीतून करत असताना वन विभागाला मात्र अभिसरण योजनेतून दोन कोटी वृक्ष लागवडीचा अट्टाहास के.के. यांनी चालविला आहे.

मंत्रालयातून अभिसरण योजनेवर शिक्कामोर्तब२६ विभागांकडे १० कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट देताना वन विभाग वगळता अन्य विभागांना राज्य योजनेतून निधी मिळणार आहे. वृक्ष लागवडीचे टार्गेट पूर्ण करताना राज्य योजनेतून वन विभागाला डावलले आहे. नियोजन विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली नायर यांनी १९ जून रोजी परिपत्रक जारी करून वन विभागाने दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट अभिसरण योजनेतून करावे, असे स्पष्ट केले आहे. त्याकरिता ग्रामपंचायतीतून मजुरांची मागणी, आराखडा तयार करावा, असे नमूद आहे.

ग्रामीण भागात शेती कामे, मजूर मिळेनासध्या पावसाळा सुरू झाला असून, शेती कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी २७२ रुपये दराने ग्रामीण भागात मजूरउपलब्ध होईल का? असा सवाल वन कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वन विभागात तूर्त वृक्ष लागवडीचे नियोजन ढेपाळल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभाग