शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अन्यायग्रस्त आरएफओंची कैफियत मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; विनंती बदल्यांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता

By गणेश वासनिक | Updated: September 6, 2024 14:13 IST

Amravati : वन विभागात प्रादेशिकची पदे रिक्तच, मंत्रालयातील ‘अर्थ’पूर्ण कारणाचा फटका

अमरावती: राज्यातील १७९ आरएफओंच्या नुकत्याच प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर आता विनंती बदल्यांसाठी मोक्याच्या जागा रिक्त ठेवल्यामुळे वन विभागात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रशासकीय बदल्यांमध्ये अन्याय झालेले काही आरएफओ राजकीय आश्रयास गेले असून या रिक्त पदांचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात पोहोचविला आहे. त्यामुळे सध्या तरी विनंती बदल्यांना ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येते.

मार्चमध्ये मागितल्या गेलेल्या पसंतीक्रम वेळी एकूण १२९ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी ८८ वनपरिक्षेत्र रिक्त दाखवण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये १९७ वनपरिक्षेत्र अधिकारी यांची सहाय्यक वनसंरक्षक पदोन्नती झाल्यानंतर सदर जागा रिक्त झाल्यामुळे त्यांच्यासाठी नव्याने पसंतीक्रम मागविण्यात आले नाहीत. हा सर्व प्रकार विनंती बदल्यांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर ‘अर्थ’पूर्ण कारणासाठी मुद्दाम होऊन केल्याचे बोलले जात आहे. तसेच वृत्तनिहाय महत्त्वाच्या प्रादेशिक तसेच वन्यजीव जागा रिक्त ठेवण्यात आले आहे. 

कार्यकाळ पूर्ण नाही तरीही आरएफओंच्या बदल्या कशा?तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या आरएफओंना त्यांच्या हक्काची बदली न देता केवळ दीड ते दोन वर्षे पूर्ण कार्यकाळ केलेल्या आरएफओंना विनंती बदलीमध्ये मोक्याच्या जागा देण्यात येत आहेत. तसेच प्रादेशिकमध्ये कार्यरत असलेल्या काही आरएफओंनी कार्यकाळ पूर्ण न होताच नवीन जागी विनंती बदलीद्वारे मलईदार प्रादेशिक जागा मिळवण्याचा चंग बांधला आहे. शासन निर्णयानुसार प्रादेशिकमधून प्रादेशिकमध्ये बदली शक्य नाही

मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात मांडले वास्तवआरएफओंच्या प्रशासकीय बदल्यांनंतर आता विनंती बदल्यांमध्ये मोक्याचे क्षेत्र काबीज करण्यासाठी लॉबी कार्यरत झाली आहे. मात्र हा सर्व प्रकार ‘अर्थ’पूर्ण कारणाचा असल्याबाबतचे वास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडले आहे. त्यामुळे आरएफओंच्या बदल्यांची फाईल मुख्यमंत्र्यांच्या ‘रिमार्क’ शिवाय परत फिरल्याची माहिती आहे. विनंती बदल्या करण्यापूर्वी रिक्त पदांचा भाव ठरला आहे. प्रादेशिकच्या जागांसाठी मोठी डिमांड आहे.

‘ते’ झारीतील शुक्राचार्य कोण?वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरएफओंच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता ते अधिकार मंत्रालयाकडे दिले आहेत. मात्र मंत्रालयात काही शुक्राचाऱ्यांनी प्रादेशिक उपविभागातील ४० पेक्षा जास्त जागा रिक्त ठेवल्या आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा रिक्त असून प्रशासकीय बदल्यांमध्ये या जागांना भाव न मिळाल्यामुळे विनंती बदल्यांमध्ये मोठी बोली लावली जात आहे. प्रादेशिकची पदे रिक्त ठेवण्यामागे अर्थकारण आहे. त्यामुळे यात आरएफओंवर अन्याय झालेला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती