शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
4
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
5
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
6
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
7
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
8
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
9
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
10
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
11
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
12
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
13
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
14
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
15
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
16
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
17
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
18
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
19
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
20
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली

महाराष्ट्रात शिक्षणाची वाट अजूनही खडतरच; मेळघाटात नदी पार करून शिक्षकांना जावे लागते शाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:49 IST

Amravati : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मेळघाटातील खुटिदा गाव आजही विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना दररोज पुलाअभावी खंडू नदीपात्र ओलांडावे लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मेळघाटातील खुटिदा गाव आजही विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना दररोज पुलाअभावी खंडू नदीपात्र ओलांडावे लागते. पावसाळ्यात नदी प्रचंड वेगाने वाहत असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरतो. अद्यापही शासनाकडून या समस्येची दखल घेतली गेलेली नाही. परिणामी, लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. चिखलदरा तालुक्यातील एकताई ग्रामपंचायतअंतर्गत खुटिदा आणि सुमिता यासह तब्बल २२ गावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही, हेही एक धक्कादायक वास्तव आहे.

खुटिदा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ये-जा करण्यासाठी शिक्षकांना दररोज खंडू नदी ओलांडावी लागते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांवर कारवाई केली होती. मात्र, स्थानिक परिस्थितीमुळे शिक्षकांना अत्यंत हलाखीच्या अवस्थेत काम करावे लागते, हे दुर्लक्षिल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. नदीवर पूल नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. 

गावकरी अंधारात, सोलर लाइट्स बंद

खुटिदा व सुमिता या गावांमध्ये आजतागायत वीजपुरवठा झालेला नाही. शासनाने काही काळापूर्वी या गावांमध्ये सोलर लाइट्स बसवले होते. मात्र, नियोजनशून्य कामामुळे ते बंद पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पुन्हा अंधारात दिवस काढावे लागत आहेत. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, महिलांच्या दैनंदिन कामांवर व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेवर होत आहे.

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही विकास शून्य

  • स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली, तरी मेळघाटातील अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
  • सुरक्षित रस्ता व पूल नाहीत.
  • वीजपुरवठ्याचा अभाव.
  • सोलार लाइट्स बंद पडलेले.
  • या समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

 

घोषवाक्ये फक्त कागदोपत्री आहेत का?

'शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत असेल, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संकटांना सामोरे जावे लागत असेल आणि ग्रामस्थांना अजूनही अंधारात जगावे लागत असेल, तर शासनाची 'सर्वांना शिक्षण' आणि 'सर्वांना वीज' ही घोषवाक्ये फक्त कागदोपत्री आहेत का?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावतीSchoolशाळाTeacherशिक्षक