शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

महापालिकेचा मुख्य आपात्कालीन कक्ष २४ बाय ७ कार्यान्वित

By प्रदीप भाकरे | Updated: June 1, 2024 13:45 IST

आयुक्तांनी घेतली बैठक : वालकट कंपाऊंडस्थित अग्निशमन विभागाकडे जबाबदारी

अमरावती: पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या वतीने १ जूनपासून वॉलकट कंम्पाऊंडस्थित अग्निशमन विभागात मुख्य आपातकालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तो कक्ष ३० सप्टेंबरपर्यंत २४ बाय ७ असा कार्यरत राहील. महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी त्यासंदर्भात बैठक घेत मान्सूनपुर्व कामांचा आढावा घेतला.

             

आपातकालीन नियंत्रण कक्षामध्ये तीन पाळीमध्ये कामकाज चालणार असून प्रत्येक पाळीमध्ये एक नियंत्रण कर्मचारी, एक नियंत्रण अधिकारी व कर्मचारी कार्यान्वित असतील. त्यांना आवश्यक असणारे फावडे, घमेले, दोरखंड, घन, टिकास, कु-हाडी, बॅटरी, इत्यादी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच नियंत्रण कक्षासाठी वाहन चालक पुरविण्यात आले आहे. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्याचे काम सुध्दा नियंत्रण कक्षामार्फत होणार आहे.

           

हवामान खात्याने राज्यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्तीच्या काळात सर्व संबंधित मनपा यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सुचना मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केली आहे. अमरावती महानगरपालिकेने नैसर्गिक आपत्ती उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. अमरावती शहरात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आवश्यक ती उपाय योजना तयार करण्याच्या दृष्टीने आपातकालीन कक्षाचे प्रमुख म्हणून अग्निशमन विभाग अधीक्षक अजय पंधरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागाअंतर्गत आपतकक्षाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त हे राहतील.

 

यावर झाली चर्चाबैठकीत अनेक महत्वपुर्ण विषयांवर चर्चा झाली. तसे आदेश देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापना कक्षाची झोन निहाय स्थापना करणे, महानगरपालिकेच्या विविध विभागांकरिता एसओपी तयार करणे, शोध व बचाव पथकाची स्थापना करणे, शहरातील नाल्यांच्या गाळ काढणे, विद्युत, प्रकाश व्यवस्था अद्यावत ठेवणे, शहरातील संभाव्य पुरग्रस्त भागाचा शोध घेऊन नोंद ठेवणे, औषधी साठा पुरवठा व वितरण व्यवस्था करणे, ब्लिचिंग पावडर व इतर रोग नियंत्रक इत्यादीची फवारणी करणे, आपातकालीन स्थितीत निवा-याची व्यवस्था करणे, शहरातील शिकस्त इमारतीची नोंद घेणे व घरमालकांना नोटीस बजावणे. 

सर्व विभाग प्रमुखाने आपआपल्या विभागाची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे व जबाबदारीने पार पाडण्याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी.

देविदास पवार, मनपा आयुक्त

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलAmravatiअमरावती