शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दिवंगत व्यक्तीच्या वारसांना मिळेल शासकीय नोकरी; कोण असेल पात्र कुटुंबीय, वारसदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:14 IST

Amravati : खून, अत्याचार प्रकरणातील 'त्या' दिवंगतांच्या वारसांची शासनाकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला शासकीय व निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी मिळणार आहे. यासंदर्भात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यपद्धतीच्या अंमलबजावणीसाठी परिपत्रक जारी केले आहे.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने १४ एप्रिल २०१६ रोजी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २३ डिसेंबर २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. यात दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला गट 'क' व गट-'ड' संवर्गातील पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देणे आणि त्याबाबतच्या कार्यपद्धतीला शासन मान्यता देण्यात आली आहे. 

प्रकरणे ८८९ प्रलंबित

समाजकल्याण आयुक्तांच्या अहवालानुसार, जुलै २०२५ पर्यंतची एकूण ९३३ प्रकरणे खून, मृत्यूची आहेत. त्यापैकी यापूर्वी नोकरी दिलेली ४४ प्रकरणे वगळता ८८९ प्रकरणे नोकरी देण्याकरिता प्रलंबित आहेत. अनुसूचित जातीची ७३८ आणि अनुसूचित जमातीची १५१ प्रकरणे असून, प्रलंबित प्रकरणांना ही कार्यपद्धती लागू आहे. 

...अन्यथा ४ एकर कोरडवाहू, दोन एकर बागायती शेतजमीन

दिवंगत व्यक्तीच्या वारसदाराला शासकीय व निमशासकीय नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. मात्र, दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबात एकही वारसदार व्यक्ती नियुक्तीसाठी पात्र नाही किंवा कुटुंबातील पात्र वारसदार नोकरी करण्यास तयार नसेल अथवा एकही पात्र वारसदार उपलब्ध नसेल, अशा परिस्थितीत कोणालाही नोकरी देणे शक्य होत नसल्यास संबंधित कुटुंबासला ४ एकर कोरडवाहू लागवडीयोग्य शेतजमीन किंवा २ एकर बागायती शेतजमीन देऊन पुनर्वसन करावे लागणार आहे

नोकरी मिळण्यासाठी आवश्यक परिस्थिती

दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला आरोपपत्र दाखल झाल्यानंतर किंवा ज्या प्रकरणात विहित कालावधीत आरोपपत्र दाखल झाले नाही, अशा प्रकरणात प्रथम खबरी अहवाल नोंदवल्यानंतर ९० दिवसांच्या आत जे अगोदर घडेल त्यानुसार नोकरी देण्यात येईल. एका पात्र वारसदाराने वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. वारसदाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. वयाची ४५ वर्षे पूर्ण होईपर्यंत नियुक्ती न मिळाल्यास अशा वारसदाराचे नाव प्रतीक्षा सूचीतून वगळण्यात येईल.

असे असतील नोकरीसाठी पात्र कुटुंबीय, वारसदार

वारसदार व्यक्तींपैकी एका व्यक्तीला नोकरी मिळणार आहे. यात दिवंगत व्यक्तीची पत्नी वा पती, विवाहित वा अविवाहित मुलगा, मुलगी तसेच मृत्यूपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला मुलगा वा मुलगी, दिवंगत व्यक्तीची सून, दिवंगत व्यक्तीची घटस्फोटित विधवा, परित्यक्ता मुलगी अथवा घटस्फोटित विधवा, परित्यक्ता बहीण अथवा दिवंगत अविवाहित असल्यास भाऊ अथवा बहीण यांचा समावेश असेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Government Job for Kin of Deceased in Atrocity Cases

Web Summary : Kin of deceased in atrocity cases to get government jobs. The social justice department issued a circular for implementation. Certain family members are eligible if no one is eligible, land compensation will be provided.
टॅग्स :AmravatiअमरावतीSC STअनुसूचित जाती जमाती