शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोर्ट म्हणाले, बेलोरा विमानतळाच्या विकासात का हयगय करता?; सुनील देशमुख यांच्या याचिकेवर फटकार

By गणेश वासनिक | Updated: March 18, 2023 19:50 IST

सरकारने निधी दिला, विकासकामांचा टाइमबाँण्ड ठरविला

अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या विकासाचा गाडा थांबला असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बेलोरा विमानतळाच्या विकासात का हयगय करता, अशी राज्य सरकारला विचारणा केली. तथापि, आता विमानतळाच्या विकासासाठी निधी दिला, विविध कामांचे कार्यारंभ आदेश निर्गमित केले आणि १७ एप्रिल २०२४ पर्यंत एकूणच कामे पूर्ण होतील, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने कोर्टात सादर केले.

माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी बेलोरा विमानतळाची विकासकामे ठप्प असल्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ४८/२०२२ अन्वये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन (सिव्हिल एव्हिएशन) प्रधान सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांना प्रतिवादी केले होते. त्या अनुषंगाने कोर्टाने बेलोरा विमानतळाच्या विकासात येणाऱ्या अडचणी, राज्य सरकारची भूमिका आणि प्रलंबित कामांबाबत विचारणा केली. अगोदर विमानतळासाठी राबविण्यात आलेल्या विकासकामाच्या निविदा, पूर्ण झालेली कामे आणि सद्य:स्थितीचा राज्य सरकारला उच्च न्यायालयाने जाब विचारला.

विमानतळाची कामे अपूर्ण असल्याबाबत कोर्टाने चांगलेच फटकारले. त्यामुळे राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बारा महिन्यांत एकूणच विकासकामे पूर्ण करू, असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात ९ मार्च २०२३ रोजी सादर केल्यामुळे बेलोरा विमानतळावरून विमानांचे टेक ऑफ घेण्याची स्वप्ने पूर्णत्वास येतील, असा विश्वास निर्माण झाला आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. प्रवीण पाटील यांनी हायकोर्टात कामकाज पाहिले.बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध असताना गत १६ वर्षांत फारसा विकास झाला नाही. शासन, प्रशासन स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला. लालफितशाहीच्या कारभारामुळे विमानतळाची विकासकामे गती घेऊ शकली नाही. अखेर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. आता उच्च न्यायालयाने सरकारचे उत्तरदायित्व निश्चित केले आहे. १७ एप्रिल २०२४ पर्यंत एकूणच कामे पूर्ण करावे लागतील.- डॉ. सुनील देशमुख, माजी मंत्री, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीSunil Deshmukhसुनिल देशमुख