शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

निविदा ‘मॅनेज’ कंत्राट निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 10:13 PM

शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे८३ कोटींची कामे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरली

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब आ. सुनील देशमुख यांनी निदर्शनास आणली असून, मजीप्राच्या अधिकाऱ्यांचे पितळ त्याअनुषंगाने उघडकीस आले आहे, हे विशेष.मुख्य जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले ८७ बोगस एअर व्हॉल्व्ह ८३ लाख रुपयांतून बसविण्यात आले आहेत. त्यानंतर मजीप्राच्या अफलातून कारभार समोर आला आहे. ‘अमृत’ अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ मध्ये तब्बल ११४ कोटी रुपयांतून पाणीपुरवठा वितरण नलिकांचे कार्य नवीन जलकुंभ निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८३ कोटींच्या कामांचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी अगोदरच नाशिक येथील मयूर व्हॉल्व्ह कंपनी निश्चित करण्यात आली. त्याकरिता मजीप्राने ३० आॅगस्ट २०१६ रोजी व्ही.ई.१६/१७ पीओ-०८ आदेशानुसार जलवाहिनीवर बसविलेल्या व्हॉल्व्हची तांत्रिक तपासणी केली, असा अहवाल डॉ. अमीन कंट्रोलर्स प्रा.लि. कंपनीने दिला आहे. मात्र, मजीप्राने १० आॅक्टोबर २०१६ रोजी पाणीपुरवठा कामांसंदर्भात नाशिक येथील मयूर कंपनीला एअर व्हॉल्व्ह बसविण्याबाबत कार्यारंभ आदेश दिले.खरे तर मजीप्राने ८३ लाख रुपयांतून जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. असे असताना नाशिक येथील पी.ए. आडके व वैद्य इलेक्ट्रिकल यांना दोन महिन्यांपूर्वीच मजीप्राला एअर व्हॉल्व्ह लागेल, हे कसे माहीत पडले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एअर व्हॉल्व्हसंदर्भात त्रयस्थ एजन्सीकडून तपासणी करण्यात आली असता, ही बाब निदर्शनास आली आहे. क्वॉलिटी कंट्रोलची तपासणी ३० आॅगस्ट २०१६, तर पाणीपुरवठा कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले आहे. त्यामुळे मजीप्राने अगोदर एजन्सी ठरविली, नंतर कामांचे आदेश दिले, हे स्पष्ट होते.व्हॉल्व्हची ही स्थिती; अन्य कामांचे काय?मजीप्राने जुनी जलवाहिनी बदलून त्याऐवजी ६०० किमी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. नव्याने सहा जलकुंभ, सिंभोरा येथे नवे पंप स्टेशन, तपोवन येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र आदी पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे सुरू आहेत. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यात झालेली गडबड बघता, अन्य कामांमध्येही मोठा घोळ असल्याचा संशय वर्तविला जात आहे.व्हॉल्व्हचे क्वॉलिटी कंट्रोल ३० आॅगस्ट रोजी झाले, तर कामांचे कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरविण्याचा करिश्मा मजीप्राने केला आहे. नाशिक येथील एजन्सीला मजीप्राला अमूक साहित्य लागणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच कळले.- सुनील देशमुखआमदार.