शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दहा वर्षांतील वनक्षेत्राच्या आगीचे 'ऑडिट'; पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 19:26 IST

 वनवणव्याचे नियोजन प्रारंभ

अमरावती: दरवर्षी वनक्षेत्र, जंगलांना सततच्या लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी वनविभागाने नियोजन चालविले आहे. गत १० वर्षांत वनक्षेत्रात सलग लागलेल्या आगीची माहिती गोळा करण्यात येत आहे. ही आग नैसर्गिक की मनुष्यनिर्मित? याचा शोध घेतला जाणार आहे. पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आग प्रामुख्याने लक्ष्य केणार आहे. 

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १५ फेब्रुवारी २०२० पासून जंगलक्षेत्रात आगीचा हंगाम सुरु होण्याचा पार्श्वभूमीवर युद्धस्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. व्याघ्र प्रकल्प आणि वनक्षेत्रात आग नियंत्रणासाठी निधीची आवश्यकता आणि उपाययोजनांसाठी २ जानेवारीला महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. व्याघ्र प्रक ल्प, वन विभाग आणि वन विकास महामंडळांच्या नियंत्रणातील जंगलात आग लागत असल्याचे मंथन झाले.

विशेषत: गेल्या १० वर्षात ठराविक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. आगप्रकरणी आरोपी अटकेत, वन्यजीवांचे नुकसान, संवेदनशील क्षेत्रात अतिरिक्त मनुष्यबळ, विशेष कॅम्प तयार करणे, स्थानिकांमध्ये जनजागृती, वाहनांची गरज, पर्यायी इंधन पुरवठा आदींबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वनवणवा रोखण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.

१५ जानेवारीपासून जाळ रेषा विशेष मोहीम

आगीचे हंगाम १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२० या दरम्यान जंगलक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे ही विशेष राबविली जाणार आहे. त्याकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लोअर मशीन, ग्रास कटर, अग्निरक्षकांची नेमणूक, अग्निरोधक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.

दहा वर्षांत २५ हजार हेक्टर वनक्षेत्र खाक

राज्यात वनक्षेत्र आणि जंगलांना लागलेल्या आगीत गत १० वर्षांत २५ हजार वनक्षेत्र खाक झाल्याच्या आकडेवारीवर बैठकीत वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एप्रिल, मे या दोन महिन्यात जंगलांना आग लागत असून, याच काळात जंगलाचे रक्षण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.  आगीच्या घटनांमध्ये ºहास होण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. वनक्षेत्रांना आग लागूच नये, यासाठी वनाधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत सूचना दिला जातील. आग रोखण्यासाठी उपाययोजनांकरिता निधी कमी पडू देणार नाही. जंगलासह वन्यजीवांचे रक्षणाला प्राधान्य दिले जाईल.

- संजय राठोड,वनमंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :fireआगforestजंगलforest departmentवनविभागMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती