शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांतील वनक्षेत्राच्या आगीचे 'ऑडिट'; पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 19:26 IST

 वनवणव्याचे नियोजन प्रारंभ

अमरावती: दरवर्षी वनक्षेत्र, जंगलांना सततच्या लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी वनविभागाने नियोजन चालविले आहे. गत १० वर्षांत वनक्षेत्रात सलग लागलेल्या आगीची माहिती गोळा करण्यात येत आहे. ही आग नैसर्गिक की मनुष्यनिर्मित? याचा शोध घेतला जाणार आहे. पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आग प्रामुख्याने लक्ष्य केणार आहे. 

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १५ फेब्रुवारी २०२० पासून जंगलक्षेत्रात आगीचा हंगाम सुरु होण्याचा पार्श्वभूमीवर युद्धस्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. व्याघ्र प्रकल्प आणि वनक्षेत्रात आग नियंत्रणासाठी निधीची आवश्यकता आणि उपाययोजनांसाठी २ जानेवारीला महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. व्याघ्र प्रक ल्प, वन विभाग आणि वन विकास महामंडळांच्या नियंत्रणातील जंगलात आग लागत असल्याचे मंथन झाले.

विशेषत: गेल्या १० वर्षात ठराविक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. आगप्रकरणी आरोपी अटकेत, वन्यजीवांचे नुकसान, संवेदनशील क्षेत्रात अतिरिक्त मनुष्यबळ, विशेष कॅम्प तयार करणे, स्थानिकांमध्ये जनजागृती, वाहनांची गरज, पर्यायी इंधन पुरवठा आदींबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वनवणवा रोखण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.

१५ जानेवारीपासून जाळ रेषा विशेष मोहीम

आगीचे हंगाम १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२० या दरम्यान जंगलक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे ही विशेष राबविली जाणार आहे. त्याकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लोअर मशीन, ग्रास कटर, अग्निरक्षकांची नेमणूक, अग्निरोधक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.

दहा वर्षांत २५ हजार हेक्टर वनक्षेत्र खाक

राज्यात वनक्षेत्र आणि जंगलांना लागलेल्या आगीत गत १० वर्षांत २५ हजार वनक्षेत्र खाक झाल्याच्या आकडेवारीवर बैठकीत वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एप्रिल, मे या दोन महिन्यात जंगलांना आग लागत असून, याच काळात जंगलाचे रक्षण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.  आगीच्या घटनांमध्ये ºहास होण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. वनक्षेत्रांना आग लागूच नये, यासाठी वनाधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत सूचना दिला जातील. आग रोखण्यासाठी उपाययोजनांकरिता निधी कमी पडू देणार नाही. जंगलासह वन्यजीवांचे रक्षणाला प्राधान्य दिले जाईल.

- संजय राठोड,वनमंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :fireआगforestजंगलforest departmentवनविभागMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती