शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
2
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

एका ठिकाणी टँकर, १० गावांत विहिर अधिग्रहण; यंदा मार्चपासून टंचाईच्या झळा   

By जितेंद्र दखने | Published: March 15, 2023 6:52 PM

ग्रामीण भागातील चित्र; मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता

अमरावती : यंदा अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय चार तालुक्यांतील दहा गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल व त्यानंतरच्या मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाचा पाणी टंचाई कृती आराखडा सुमारे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा जोरदार झाला असला तरी पाण्याच्या साठवणुकीत प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, असे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा चिखलदरा तालुक्यात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी टंचाईची भीषणता पाहता यंत्रणेकडून केला जात असलेल्या उपाययोजना केव्हा फायदेशीर ठरणार, हा खरा प्रश्न आहे.

चिखलदरा तालुक्यातील १५ गावांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार आजघडीला आकी या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, अमरावती, तिवसा, चिखलदरा या चार तालुक्यांमधील दहा गावांतील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून त्या गावांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

या आहेत उपाययोजना

नवीन विंधन विहिरी, नवीन हातपंप, खासगी विहिरींचे अधिग्रहण, नळयोजनाची विशेष दुरुस्ती, विहिरींचे व तलावांचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.या गावात विहिरी, बोअर अधिग्रहण

अमरावती तालुक्यातील देवरा, कस्तुरा, माेगरा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी कानडा, नागझरी, परसमंडळ, भातकुली तालुक्यातील दाढी-पेढी, चिखलदरा तालुक्यातील आकी, हतरू सरपंच ढाणा, तिवसा तालुक्यातील शिदवाडी अशा चार तालुक्यांमधील दहा गावांतील नागरिकांची विहीर व बोअर अधिग्रहण करून तहान भागविली जात आहे.यंदाच्या पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखड्यानुसार कामांचे नियोजन केले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक तसेच प्रस्तावित सर्व उपाययोजना करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातAmravatiअमरावतीWaterपाणीMelghatमेळघाटChikhaldaraचिखलदरा