शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एका ठिकाणी टँकर, १० गावांत विहिर अधिग्रहण; यंदा मार्चपासून टंचाईच्या झळा   

By जितेंद्र दखने | Updated: March 15, 2023 18:57 IST

ग्रामीण भागातील चित्र; मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता

अमरावती : यंदा अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय चार तालुक्यांतील दहा गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल व त्यानंतरच्या मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाचा पाणी टंचाई कृती आराखडा सुमारे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा जोरदार झाला असला तरी पाण्याच्या साठवणुकीत प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, असे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा चिखलदरा तालुक्यात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी टंचाईची भीषणता पाहता यंत्रणेकडून केला जात असलेल्या उपाययोजना केव्हा फायदेशीर ठरणार, हा खरा प्रश्न आहे.

चिखलदरा तालुक्यातील १५ गावांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार आजघडीला आकी या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, अमरावती, तिवसा, चिखलदरा या चार तालुक्यांमधील दहा गावांतील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून त्या गावांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

या आहेत उपाययोजना

नवीन विंधन विहिरी, नवीन हातपंप, खासगी विहिरींचे अधिग्रहण, नळयोजनाची विशेष दुरुस्ती, विहिरींचे व तलावांचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.या गावात विहिरी, बोअर अधिग्रहण

अमरावती तालुक्यातील देवरा, कस्तुरा, माेगरा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी कानडा, नागझरी, परसमंडळ, भातकुली तालुक्यातील दाढी-पेढी, चिखलदरा तालुक्यातील आकी, हतरू सरपंच ढाणा, तिवसा तालुक्यातील शिदवाडी अशा चार तालुक्यांमधील दहा गावांतील नागरिकांची विहीर व बोअर अधिग्रहण करून तहान भागविली जात आहे.यंदाच्या पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखड्यानुसार कामांचे नियोजन केले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक तसेच प्रस्तावित सर्व उपाययोजना करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातAmravatiअमरावतीWaterपाणीMelghatमेळघाटChikhaldaraचिखलदरा