शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

डोक्यावर सिलेंडर घेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 19:03 IST

निवडणूक संपली की भाव वाढ हे काही योग्य नाही,  त्यामुळे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला.

ठळक मुद्देमहागाईच्या विरोधात अमरावतीत ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलन

अमरावती : पाच राज्यातील निवडणुका संपताच अपेक्षेप्रमाणे देशात महागाईचा विस्फोट झाला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून निवडणुकीचा हंगाम वगळता सातत्याने महागाई वाढत चालली आहे. खोट बोल आणि रेटून कर अस केंद्र सरकारचं चाललं असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या व अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला. 

आज (दि. ४ एप्रिल) अमरावती येथील इर्विन चौकात ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनात डोक्यावर सिलेंडर घेऊन त्या मोदी सरकारच्या महागाई विरोधातील ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलनात सहभागी झाल्या. तसेच त्यांनी केंद्र सरकारचा जाहीर  निषेध करीत घोषणाही दिल्या.

निवडणूक संपत नाही तोच पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच महागले. ही भाव वाढ हे काही योग्य नाही,  त्यामुळे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला. तसेच केंद्र सरकारच्या दुजाभावामुळे केंद्र आणि राज्य हा संघर्ष या देशाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने एवढी महागाई वाढवणं हे अपेक्षित नाही, हे त्रासदायक आहे. तसेच, जे काही केंद्र सरकार करतं ते सगळ सोन्याहून पिवळं आणि राज्य सरकार एकदम गटारमधली, ही जी पद्धत सुरू झाली ते देशासाठी चांगलं नाही. जे अधिकार केंद्राचे आहेत ते केंद्राचे आहेच पण जे अधिकार राज्याचे आहे ते राज्याचेच आहेत. हा संघर्ष या देशाला कुठे नेऊन ठेवेल अजून तुकडे पाडेल का देशाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे, असेही त्या म्हणाल्या. संविधानाला कस तोडता येईल याच्याकडे केंद्र सरकारचे संपूर्ण लक्ष केंद्रित असल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते आणि जनता  मोठया संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाYashomati Thakurयशोमती ठाकूरFuel Hikeइंधन दरवाढInflationमहागाई