शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आत्मक्लेश ते मंत्रालयात हल्लाबोल आंदोलन @ १०३

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 10:24 IST

मोर्शी येेथे बेमुदत आंदोलन; भूसंपादनाच्या मोबदल्यात फरकाची रक्कम तसेच विविध मागण्यांसाठी लढा

अमरावती : अमरावती महानगराला पाणीपुरवठा होणाऱ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा प्रकल्पाच्या धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात शासन, प्रशासन ते सरकार असा तब्बल १०३ दिवसांपर्यंत पाठपुरावा केला. यादरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव, मायवाडी एमआयडीसीतून होणारा पाणीपुरवठा तोडण्याचे आंदोलन, रास्ता रोको, अप्पर वर्धा धरणावर हल्लाबोल, मोर्शी येथे जिल्हाधिकाऱ्यांना विश्रामगृहावर घेराव, साखळी उपोषण अशी नानाविध आंदोलने करून लक्ष वेधले. मात्र, मागण्या लालफीतशाहीत रुतल्याचे दिसून येताच मंगळवारी थेट मंत्रालयातच लक्षवेधी हल्लाबोल आंदोलन करून राज्य सरकारला लक्ष देण्यास भाग पाडले.

जमिनी दिल्यात, वाढीव मोबदला का नाही, असा सवाल उपस्थित करून ७५ वर्षीय ज्योतीराम बानेकर, विठ्ठलराव नागले, दिलीप पंडागळे, पंजाबराव ठाकरे, घनश्याम सोनार हे प्रकल्पग्रस्त प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आंदोलनस्थळी ठाम आहेत. १९ मे २०२३ पासून आंदोलन प्रारंभ झाले असून, ते आजतागायत कायम आहे.

- तर मंत्रालयासमोर विष घेऊ

निगरगट्ट शासनाने तोडगा काढला नाही, दखलही घेतली नाही. म्हणून नाइलाजाने मंगळवारी मुंबई मंत्रालयात मोर्शी-वरूड येथील प्रकल्पबाधित २५० ते ३०० शेतकरी बांधवांनी मिळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. किंबहुना शासनाने याबाबत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, समस्या सोडविल्या नाहीत, तर मंत्रालयासमोर विष घेऊन आत्महत्या करू, असा इशारासुद्धा शेतकऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनMantralayaमंत्रालयAmravatiअमरावती