शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:46 PM

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्यांची पोलीस यंत्रणा अद्यापही गावांकडे फिरकली नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपोलीस अंमलबजावणी करेनात : परप्रांतीय मेंढ्यांची घुसखोरी सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्यांची पोलीस यंत्रणा अद्यापही गावांकडे फिरकली नसल्याचे चित्र आहे.भातकुली तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये परजिल्ह्यांसह परप्रांतीय शेळया-मेंढ्या स्थानिकांची शेती व चारा फस्त करीत आहेत. तालुका आणि उपविभागीय अधिकाºयांच्या आदेशाला तिलांजली मिळाल्याने त्रस्त ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन शेळ्या-मेंढ्या पकडून कोंडवाड्यात टाकण्यास सुरुवात केली आहे.शेतकºयांचे नुकसान व रक्तरंजित संघर्ष टाळण्यासाठी काठेवाडींकडील चराईसाठी येणाºया जनावरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते यांनी २९ जानेवारी रोजी आदेश काढले. ही प्रवेशबंदी १५ मार्चपर्यंत अस्तित्वात राहील. तथापि, ते आदेश अद्यापही कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. भातकुली तालुक्यातील सायत, निंभा, हरताळा, भातकुली, गणोरी, गणोजा, गोपगव्हाण, हातुर्णा, सातुर्णा, अळणगाव, कुंड व लगतच्या अन्य गावांत जिल्ह्याबाहेरून लाखावर शेळ्या- मेंढ्या चराईसाठी आल्या आहेत. आधीच दुष्काळ असताना बाहेरील मेंढ्यांनी जंगल फस्त करणे सुरू केले आहे. त्या शेळ्या- मेंढ्या नव्याने केलेल्या वृक्षारोपणावर ताव मारत असल्याने ही घुसखोरी थांबवावी, अशी विनंती सायतचे सरपंच अनिल वर्धे यांनी तहसील व पोलीस प्रशासनाकडे केली. त्यांच्या पत्राची दखल घेत तिवसा-भातकुलीच्या एसडीओंनी प्रवेशबंदी केली. मात्र, १^^६ फेब्रु्रवारी रोजीसुद्धा सायत, अळणगाव, खारतळेगाव, खोलापूर, विर्शी, गोपगव्हाण, वासेवाडीलगत गावांत परप्रांतीयांच्या हजारो शेळ्या-मेंढ्या धुडगूस घालीत आहेत. आता पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.सरपंच अनिल वर्धे यांनी शनिवारी सायतमधील काठेवाडींच्या शेळ्या-मेंढ्या गावाबाहेर हाकलत त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त केले.पोलिसांकडून हवी कारवाईबाहेरील सर्व जनावरांना भातकुली तालुक्यात प्रवेशबंदी घातल्याची माहिती भातकुलीसह वलगाव, खोलापूर, बडनेरा, आसेगाव पूर्णा व लोणी पोलिसांना देण्यात आली आहे. भातकुली तालुक्यातील गावे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. प्रवेशबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्यक्षात पोलिसांकडून फारशी कारवाई होत नसल्याने आणि ग्रामस्थ त्या मेंढ्या गावातून हद्द पार करू लागल्याने नवा वाद पेटण्याची भीती निर्माण झाली आहे.भातकुली तालुक्यातील ज्या गावांमधून तक्रारी प्राप्त झाल्यात, त्या गावात शिरलेल्या मेंढपाळांच्या मुखियांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नोटीस बजावण्यात आल्या. अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेत.- पंकज दाभाडेप्रभारी ठाणेदार, भातकुलीस्थानिक आणि परप्रांतीय मेंढपाळांतील संघर्ष टाळण्यासाठीच बाहेरील व काठेवाडी गुराढोरांना तालुक्यात प्रवेशबंदी घातली आहे. कारवाई व अंमलबजावणीसाठी आदेशाच्या प्रती संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना पाठविल्यात.- विनोद शिरभाते, एसडीओ