शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या खारकीव्हमधून ऋषभ गजभिये निघाला आहे. त्याने रोमानियाची सीमा गाठली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रशिया आणि युक्रेन या देशांत सुरू झालेल्या युद्धामुळे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसला आहे; तर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध लागले आहे. गुरुवारी हिमवृष्टी आणि उणे १० डिग्री तापमान असतानासुद्धा अमरावतीचा ऋषभ गजभिये याने रोमानियाची सीमा गाठली, तर स्नेहा लांडगे ही दिल्ली येथे पोहोचल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ११ पैकी ६ विद्यार्थी भारतात पोहोचले असून, ५ विद्यार्थी प्रवासात आहेत.युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या खारकीव्हमधून ऋषभ गजभिये निघाला आहे. त्याने रोमानियाची सीमा गाठली आहे. गत तीन दिवसांपासून रोमानिया सीमेवर हिमवृष्टी होत असल्याने सीमा पार करताना जीव मुठीत घेऊन भारतीय व रोमानिया दूतावासांत पोहोचावे लागले. एकूणच भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध लागले आहेत. गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास स्वराज गणेश पुंड निवासस्थानी पोहोचला. यावेळी नागरिकांनी त्याचे स्वागत केले.

थंडीचे तीन दिवस जीवन-मरणाचेरोमानिया सीमेवर तीन दिवस हिमवृष्टीमुळे मरणयातना भोगाव्या लागल्या. दूतावासात चांगली वागणूक मिळाली नाही. थंडीमुळे प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत, अशा संतप्त भावना युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या आहेत. सीमा ओलांडताना जीव मुठीत घेऊन वृषभ बाहेर पडला, असे त्याचे वडील वैभव गजभिये यांनी सांगितले. सर्वच विद्यार्थी सुखरूप यावे, अशी मनीषा व्यक्त केली.

युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी आतापर्यंत ६ विद्यार्थी भारतात दाखल झाले आहेत. पाच विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी मार्गस्थ आहेत.- आशिष बिजवल, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

ऋषभ याने अतिशय कठीण प्रसंगातून युक्रेनमधून रोमानियाची सीमा ओलांडली आहे. रेल्वे, टॅक्सी यांचा त्याला आधार घ्यावा लागला. अमरावतीत पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. गुरुवारी व्हिडिओ कॉलने त्याने संवाद साधला. विशेष विमान उपलब्ध झाल्यानंतरच भारतात येईल, असे तो म्हणाला.- वैभव गजभिये, अमरावती (ऋषभचे वडील)

अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी कुठे, कसे?- प्रणव पुनसे हा अमरावतीत घरी पोहोचला.- तुषार गंधे बुधवारी रात्री ७ वाजून ३० वाजता व्हिडीओ कॉलवरून हंगेरी बुडापेस्ट शहरात मुक्कामी. - तनिष सावंत बुधवारी रात्री ११ वाजून ३० वाजता हंगेरी येथील बुडापेस्ट शहरात मुक्काम. - ऋषभ गजभिये हा गुरुवारी सकाळी ११ वाजता रोमानिया सीमेपासून ४० किलोमीटर लांब आहे.- स्वराज पुंड हा गुरुवारी सकाळी दिल्लीवरून विमानाने नागपूरकडे रवाना झाला. रात्री अमरावतीत घरी पोहोचला.- प्रणव भारसाकडे बुधवारी रात्री ८ वाजून ३० वाजता हंगेरी येथील बुडापेस्ट शहरात मुक्कामी. - मोहम्मद रिजवान बुधवारी रात्री १० वाजता रोमानिया बॉर्डरवरून विमानतळाकडे रवाना झाला.- कुणाल कावरे गुरुवारी सकाळी १० वाजून ३० वाजता दिल्ली येथे पोहोचला आहे.- नेहा लांडगे हिने बुधवारी रात्री टेस्क मॅसेजनुसार ती गुरुवारी दिल्ली येथे पोहोचली.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी