शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

पोहरा अभयारण्याच्या निर्मितीत आडकाठी

By admin | Updated: March 12, 2015 00:55 IST

पोहरा- मालखेड या विर्स्तीण जंगलात अभयारण्य निर्माण करण्याचा दिशेने शासनाने पाऊल उचलले असतानाच स्थानिक गावकरांनी त्याला जोरदार विरोध केला आहे.

अमरावती : पोहरा- मालखेड या विर्स्तीण जंगलात अभयारण्य निर्माण करण्याचा दिशेने शासनाने पाऊल उचलले असतानाच स्थानिक गावकरांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे प्रस्तावित अभयारण्याचा निर्णय घोषित करण्याच्या टप्प्यात असताना यात आडकाठी आली आहे. प्रस्तावित अभयारण्यात २३ गावांचा समावेश असल्याची माहिती आहे.वडाळी आणि चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्रात जंगलात वाघ वगळता अन्य वन्यप्राणी आहे. त्यांचे संगोपन, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून १० वर्षांपुर्वी मालखेड- पोहरा अभयारण्य निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. अभयारण्य निर्माण झाल्यास केंद्र शासनाच्या विविध योजनांचा गावकरांना लाभ मिळेल, या अनुषंगाने २३ गावे कायम ठेवत अभयारण्य निर्माण करण्यासाठी गावकरी, ग्रामपंचायतची मते जाणून घेतल्या गेली. १६ हजार व्यक्तींची अभयारण्य निर्मितीसाठी मते जाणून घेताना ९ ते १० हजार नागरिकांनी अभयारण्य नकोच ही भूमिका घेतली. सर्वेक्षणाअंती गावकऱ्यांच्या हरकती शासनाला कळविल्या असता राज्याचे प्रधान वनसचिवांनी अभयारण्य निर्मितीबाबत गावकऱ्यांच्या मनात असलेली भीती, संशयकल्लोळ, गैरसमज दूर करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अभयारण्यामुळे पर्यारवणास चालना मिळण्यासह विकासाची दारे खुलतील, अशी गावकऱ्यांची समजूत घालून मते परिवर्तीत करण्याचा सल्ला वनविभागाला देण्यात आला. नागरिकांची हरकत असल्याशिवाय अभयारण्य निर्माण शक्य नाही, असे वनसचिवांनी स्पष्ट केले आहे. मागील १० वर्षांपुर्वी झालेल्या सर्वेक्षणाला मूर्त रुप देण्याची वेळ आली असता गावकऱ्यांच्या हरकतींनी अभयारण्याच्या निर्मितीत बाधा टाकल्याचे बोलले जात आहे. शहरालगतच्या भागात खासगी व्यक्तींनी जमिनी मालमत्ता म्हणून घेवून ठेवल्या आहेत. अभयारण्य झाल्यास या जमिनी अभयारण्यात जातील, या भितीने अनेक जमिन मालकांनी सुद्धा अभयारण्य होऊ नये, यासाठी गावकऱ्यांना चुकीची माहिती पसरविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली असल्याचे दिसून येते. खरे तर अभयारण्य निर्माण झाल्यास गावकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांचा फायदा मिळेल. मात्र, अभयारण्याबाबत गावकऱ्यांमध्ये चुकीचा समज निर्माण केल्यामुळे अनेकांनी अभयारण्य निर्मितीला नकार दिला, हे खरे आहे. (प्रतिनिधी)या गावांचा होईल समावेशप्रस्तावित वडाळी- मालखेड अभयारण्य निर्माण झाल्यास २३ गावांचा समावेश होणार आहे. त्यानुसार सर्वेक्षण सुद्धा झाले असून यात पोहरा, मासोद, इंदला, बोडणा, शेवती, सावर्डी, भानखेड (मोठे), कस्तुरा, मोगरा, सावंगा, चिरोडी, कारला, चिखली, मार्डी, पिंपळखुटा, हातला, कोंडेश्वर, अंजनगाव बारी, घातखेडा, पार्डी, गोंविदपूर, भानखेडा (लहान), मालखेड, लालखेड गावांचा समावेश राहिल.मोर, बिबट्याच्या संगोपनाचे उद्दिष्टवडाळी, मालखेडच्या विर्स्तीण जंगलात मोठ्या प्रमाणात मोर, बिबट्याची संख्या आहे. एवढेच नव्हे तर निलगाय, हरिण, काळवीट, रानडुक्कर, ससे, तरसा, गवा, लांडगे, कोल्हे आदी वन्यप्राण्यांचे संगोपनाचे उद्दिष्ट पुढे करुन अभयारण्याचा प्रस्ताव आहे.काठेवाडी गुरांनी केली जमिन पडीकवडाळी वनपरिक्षेत्रात अनेकांची शेती आहे. मात्र काही वर्षांपासून या भागात मोठ्या संख्येनी काठेवाडी गुरांचा संचार असल्याने अनेकांनी शेती करण्याचा भानगडीत न पडता ती पडीक ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. वडाळी, पोहरा हा परिसर संपूर्ण जंगलाचा नसून अनेकांची शेती असल्याचे सर्वेक्षणादरम्यान स्पष्ट झाले आहे.