शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट हायवे बनलेत ‘डेंजरस’, ५३ बळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:07 IST

९२ जण मृत्युमुखी : दरदिवशी एकाचा अपघाती मृत्यू; ९० दिवसांत १६४ अपघात

अमरावती : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्हाभरात एकूण १६४ अपघात झाले असून, त्यात सर्वाधिक ९३ अपघात हे राज्य महामार्गावर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील स्टेट हायवे अधिक डेंजरस बनल्याचे वास्तव उघड झाले आहे. पाठोपाठ ३८ अपघात हे अन्य मार्गांवर तर ३३ अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर घडले आहेत.

तीन महिन्यांतील १६४ अपघातांत एकूण ९२ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ५३ जण हे राज्य महामार्गावर झालेल्या अपघातांचे बळी ठरले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गानेदेखील २२ मानवबळी घेतले आहेत. जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख गोपाल उंबरकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून अपघातांच्या सूक्ष्म अवलोकनासह जनजागृतीही हाती घेतली आहे. ‘यम है हम’ व ‘हेडलेस मॅन’च्या माध्यमातून प्रभावी जनजागरण करण्यात आले. मात्र, वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सन २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांत १५४ अपघात झाले होते. त्यात एकूण ९७ जण मृत्युमुखी पडले होते. यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांत अपघाताच्या संख्येत १० ची वाढ झाली.

राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग १२० वर

राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहने अतिशय बेदरकारपणे चालविली जातात. या मार्गांवर वाहतूक पोलिस वा महामार्ग पोलिस मर्यादित ठिकाणी राहत असल्याने अशा वाहनधारकांच्या वेगावर कुणाचाही धरबंद राहत नाही. सर्वाधिक अपघातदेखील याच मार्गांवर होतात. राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग १२० च्या पुढे जातो.

डेंजरस ड्रायव्हिंगचे २० बळी

वेग नियंत्रित ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत राहते. अपघाताची आकडेवारी पाहिल्यास त्यातील सर्वाधिक बळी हे बेदरकार वाहतुकीचे आहेत. मार्चमध्ये २६ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यात सर्वाधिक २० जण हे डेंजरस ड्रायव्हिंगचे बळी ठरले.

- गोपाल उंबरकर, वाहतूक पोलिस निरीक्षक.

वाहतूक शाखेचे सूक्ष्म अवलोकन

ओव्हरस्पीडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, राँग साईड वाहने चालविणे, हेल्मेटविना वाहने, सिग्नल तोडणे, विनासिटबेल्ट, वाहने चालवताना मोबाइलवर बोलणे व लेन कटिंग ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. जिल्ह्यातील अपघात नेमक्या कोणत्या कारणाने झाले, त्याचा सूक्ष्म अभ्यास वाहतूक शाखेने चालविला आहे. त्यात डेंजरस ड्रायव्हिंग हे मानवबळीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या ४९ अपघातांत ३४ अपघात हे डेंजरस ड्रायव्हिंग तर, १२ अपघात ओव्हर स्पीडिंगमुळे झाले आहेत.

जानेवारी ते मार्चदरम्यान झालेले अपघात

मार्ग : एकूण अपघात : प्राणांतिक अपघात : मृत्यू

  • राष्ट्रीय महामार्ग : ३३ : २१ : २२
  • राज्य महामार्ग : ९३ : ४५ : ५३
  • अन्य मार्ग : ३८ : १६ : १७
  • एकूण : १६४ : ८२ : ९२
टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गAmravatiअमरावती