शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

स्टेट हायवे बनलेत ‘डेंजरस’, ५३ बळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:07 IST

९२ जण मृत्युमुखी : दरदिवशी एकाचा अपघाती मृत्यू; ९० दिवसांत १६४ अपघात

अमरावती : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्हाभरात एकूण १६४ अपघात झाले असून, त्यात सर्वाधिक ९३ अपघात हे राज्य महामार्गावर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील स्टेट हायवे अधिक डेंजरस बनल्याचे वास्तव उघड झाले आहे. पाठोपाठ ३८ अपघात हे अन्य मार्गांवर तर ३३ अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर घडले आहेत.

तीन महिन्यांतील १६४ अपघातांत एकूण ९२ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ५३ जण हे राज्य महामार्गावर झालेल्या अपघातांचे बळी ठरले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गानेदेखील २२ मानवबळी घेतले आहेत. जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख गोपाल उंबरकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून अपघातांच्या सूक्ष्म अवलोकनासह जनजागृतीही हाती घेतली आहे. ‘यम है हम’ व ‘हेडलेस मॅन’च्या माध्यमातून प्रभावी जनजागरण करण्यात आले. मात्र, वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सन २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांत १५४ अपघात झाले होते. त्यात एकूण ९७ जण मृत्युमुखी पडले होते. यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांत अपघाताच्या संख्येत १० ची वाढ झाली.

राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग १२० वर

राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहने अतिशय बेदरकारपणे चालविली जातात. या मार्गांवर वाहतूक पोलिस वा महामार्ग पोलिस मर्यादित ठिकाणी राहत असल्याने अशा वाहनधारकांच्या वेगावर कुणाचाही धरबंद राहत नाही. सर्वाधिक अपघातदेखील याच मार्गांवर होतात. राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग १२० च्या पुढे जातो.

डेंजरस ड्रायव्हिंगचे २० बळी

वेग नियंत्रित ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत राहते. अपघाताची आकडेवारी पाहिल्यास त्यातील सर्वाधिक बळी हे बेदरकार वाहतुकीचे आहेत. मार्चमध्ये २६ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यात सर्वाधिक २० जण हे डेंजरस ड्रायव्हिंगचे बळी ठरले.

- गोपाल उंबरकर, वाहतूक पोलिस निरीक्षक.

वाहतूक शाखेचे सूक्ष्म अवलोकन

ओव्हरस्पीडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, राँग साईड वाहने चालविणे, हेल्मेटविना वाहने, सिग्नल तोडणे, विनासिटबेल्ट, वाहने चालवताना मोबाइलवर बोलणे व लेन कटिंग ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. जिल्ह्यातील अपघात नेमक्या कोणत्या कारणाने झाले, त्याचा सूक्ष्म अभ्यास वाहतूक शाखेने चालविला आहे. त्यात डेंजरस ड्रायव्हिंग हे मानवबळीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या ४९ अपघातांत ३४ अपघात हे डेंजरस ड्रायव्हिंग तर, १२ अपघात ओव्हर स्पीडिंगमुळे झाले आहेत.

जानेवारी ते मार्चदरम्यान झालेले अपघात

मार्ग : एकूण अपघात : प्राणांतिक अपघात : मृत्यू

  • राष्ट्रीय महामार्ग : ३३ : २१ : २२
  • राज्य महामार्ग : ९३ : ४५ : ५३
  • अन्य मार्ग : ३८ : १६ : १७
  • एकूण : १६४ : ८२ : ९२
टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गAmravatiअमरावती