शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

स्टेट हायवे बनलेत ‘डेंजरस’, ५३ बळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:07 IST

९२ जण मृत्युमुखी : दरदिवशी एकाचा अपघाती मृत्यू; ९० दिवसांत १६४ अपघात

अमरावती : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्हाभरात एकूण १६४ अपघात झाले असून, त्यात सर्वाधिक ९३ अपघात हे राज्य महामार्गावर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील स्टेट हायवे अधिक डेंजरस बनल्याचे वास्तव उघड झाले आहे. पाठोपाठ ३८ अपघात हे अन्य मार्गांवर तर ३३ अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर घडले आहेत.

तीन महिन्यांतील १६४ अपघातांत एकूण ९२ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ५३ जण हे राज्य महामार्गावर झालेल्या अपघातांचे बळी ठरले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गानेदेखील २२ मानवबळी घेतले आहेत. जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख गोपाल उंबरकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून अपघातांच्या सूक्ष्म अवलोकनासह जनजागृतीही हाती घेतली आहे. ‘यम है हम’ व ‘हेडलेस मॅन’च्या माध्यमातून प्रभावी जनजागरण करण्यात आले. मात्र, वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सन २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांत १५४ अपघात झाले होते. त्यात एकूण ९७ जण मृत्युमुखी पडले होते. यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांत अपघाताच्या संख्येत १० ची वाढ झाली.

राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग १२० वर

राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहने अतिशय बेदरकारपणे चालविली जातात. या मार्गांवर वाहतूक पोलिस वा महामार्ग पोलिस मर्यादित ठिकाणी राहत असल्याने अशा वाहनधारकांच्या वेगावर कुणाचाही धरबंद राहत नाही. सर्वाधिक अपघातदेखील याच मार्गांवर होतात. राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग १२० च्या पुढे जातो.

डेंजरस ड्रायव्हिंगचे २० बळी

वेग नियंत्रित ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत राहते. अपघाताची आकडेवारी पाहिल्यास त्यातील सर्वाधिक बळी हे बेदरकार वाहतुकीचे आहेत. मार्चमध्ये २६ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यात सर्वाधिक २० जण हे डेंजरस ड्रायव्हिंगचे बळी ठरले.

- गोपाल उंबरकर, वाहतूक पोलिस निरीक्षक.

वाहतूक शाखेचे सूक्ष्म अवलोकन

ओव्हरस्पीडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, राँग साईड वाहने चालविणे, हेल्मेटविना वाहने, सिग्नल तोडणे, विनासिटबेल्ट, वाहने चालवताना मोबाइलवर बोलणे व लेन कटिंग ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. जिल्ह्यातील अपघात नेमक्या कोणत्या कारणाने झाले, त्याचा सूक्ष्म अभ्यास वाहतूक शाखेने चालविला आहे. त्यात डेंजरस ड्रायव्हिंग हे मानवबळीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या ४९ अपघातांत ३४ अपघात हे डेंजरस ड्रायव्हिंग तर, १२ अपघात ओव्हर स्पीडिंगमुळे झाले आहेत.

जानेवारी ते मार्चदरम्यान झालेले अपघात

मार्ग : एकूण अपघात : प्राणांतिक अपघात : मृत्यू

  • राष्ट्रीय महामार्ग : ३३ : २१ : २२
  • राज्य महामार्ग : ९३ : ४५ : ५३
  • अन्य मार्ग : ३८ : १६ : १७
  • एकूण : १६४ : ८२ : ९२
टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गAmravatiअमरावती