शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

सोयाबीन उत्पादकांना करोडोंचा फटका ! हमीभावापेक्षा १२०० रुपयांनी कमीने खरीदी, भावांतर योजना ठरली चुनावी जुमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:58 IST

Amravati : ४,८९२ रुपये क्विंटल असा सोयाबीनचा हमीभाव जाहीर केला आहे. सोयाबीनचे चार हजारांचे आत दर आहे

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयापेंड (डीओसी) ची मागणी घटल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर गडगडले आहेत. हमीभाव ४,८९२ रुपये असताना सोयाबीनला सध्या ३,८०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फटका बसला. अशा परिस्थितीत भावांतर योजनेचा लाभदेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे सरासरी उत्पादनात कमी आली आहे. अशा स्थितीत मागणी वाढून दर वाढणार, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात हंगामापूर्वीच सोयाबीनचे दरात कमी आलेली आहे. यावर्षी केंद्र शासनाने ४,८९२ रुपये क्विंटल असा सोयाबीनचा हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र, सोयाबीनचे दर चार हजारांचे आत आहे. ७ मार्चला सोयाबीनला ३,७०० ते ३,७०० रुपये क्विंटल भाव मिळाला. ७ मार्चला यामध्ये १०० रुपयांनी वाढ झालेली आहे. प्रत्यक्षात यंदा सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत. शासनाचा कोणताही प्रक्रिया उद्योग सोयाबीनसाठी नाही. डीओसीच्या दरात कमी आल्याने प्लॉटधारकांकडून सोयाबीनची खरेदी होत नाही.

काय आहे भावांतर योजना?सन २०२३-२४ मधील हंगामात आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे कापूस व सोयाबीनचे दरात कमी आली. त्यामुळे शासनाने दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांची मदत कापूस व सोयाबीन पिकांसाठी केली. यंदाच्या हंगामात या दोन्ही पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.

सोयाबीनचे बाजारभाव (रु/क्विं)२४ फेब्रुवारी - ३,७५० ते ३,९५१२८ फेब्रुवारी - ३,८०० ते ३,९६१३ मार्च - ३,७५० ते ३,९००५ मार्च - ३,७५० ते ३,९००७ मार्च - ३,६५० ते ३,८७५१० मार्च - ३,७५० ते ३,९२५

"परदेशात उत्पादन चांगले झाल्याने देशांतर्गत सोयाबीनला सध्या उठाव नाही, सोयापेंडचे दर पडले आहेत. त्यामुळे सध्या सोयाबीनमध्ये फारशा दरवाढीची शक्यता नाही."- अमर बांबल, अडते, बाजार समिती, अमरावती

 

टॅग्स :AmravatiअमरावतीSoybeanसोयाबीनfarmingशेतीFarmerशेतकरी