शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सोयाबीन आले काढणीला पावसाचा धोका पिकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 5:00 AM

१० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हर्षभरित झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. शेंगाचे दाणे भरून हे पीक काढणीला आलेले असताना आता कापणी करून घेतल्यास हे पीक पावसाच्या माराने कुजणार किंवा शेतात तसेच उभे ठेवल्यास दाण्यांना कोंब फुटतील, अशी कुचंबणा शेतकऱ्यांपुढे आहे. या कालावधीत १० हजारांवर गेलेले दर चार हजारांवर स्थिरावले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाभरात कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस सातत्याने कोसळत आहे. ऑक्टोबर जवळ येत असताना पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर विजांच्या कडकडाटासह तो कोसळत आहे. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन काढायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हर्षभरित झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. शेंगाचे दाणे भरून हे पीक काढणीला आलेले असताना आता कापणी करून घेतल्यास हे पीक पावसाच्या माराने कुजणार किंवा शेतात तसेच उभे ठेवल्यास दाण्यांना कोंब फुटतील, अशी कुचंबणा शेतकऱ्यांपुढे आहे. या कालावधीत १० हजारांवर गेलेले दर चार हजारांवर स्थिरावले आहेत. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचलपूर तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचलपूर नगरपालिका क्षेत्रातही धो-धो पाऊस कोसळला. मल्हारा, गौरखेडा धोतरखेडा, पथरोट, जवलापूर, भिलोनासह तालुक्यातील अन्य ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेकांचे. सोयाबीन भिजले. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे कपाशीची बोंड सडायला सुरुवात झाली आहे. संत्रा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. दर्यापूर तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारीदेखील सुमारे दोन तास पाऊस कोसळला. याशिवाय तिवस्यात अर्धा तास, अचलपूर तालुक्यात दीड तास, अंजनगाव सुर्जी तालुक्यात तासभर पाऊस कोसळला. वरूड तालुक्यात राजुरा बाजारसह परिसरात अचानक काळेकुट्ट ढग दाटून १०-१५ मिनिटे जोरदार सरी कोसळल्या. धामणगाव रेल्वे तालुक्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. तळेगाव दशासर, कावली वसाड व अंजनसिंगी परिसरातही पाऊस कोसळला. चांदूर बाजार तालुक्यातही अर्धा तास पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात ढगाळ वातावरण होेते. मुसळधार पाऊस कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तुरळक सरी कोसळून पाऊस बंद झाला. धारणी तालुक्यातही पावसाचे वातावरण कायम आहे. सोयाबीन सवंगणीची कामे सुरू असताना पाऊस व्यत्यय आणत आहे. शेतजमीन ओली झाल्याने मजुरांना सवंगणी अर्ध्यावर टाकून परतावे लागत आहे. त्यासोबतच उघड्यावर टाकलेल्या सोयाबीनच्या गंजी गोळा करून ती झाकण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस