शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

खरिपाची ९५ टक्के क्षेत्रात पेरणी

By admin | Updated: August 22, 2015 00:39 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १४ हजार ९५० क्षेत्राचे कृषी विभागाचे नियोजन असताना १९ आॅगस्टअखेर ६ लाख ७७ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.

अमरावती : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १४ हजार ९५० क्षेत्राचे कृषी विभागाचे नियोजन असताना १९ आॅगस्टअखेर ६ लाख ७७ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. हे क्षेत्र एकूण सरासरी क्षेत्राच्या ९४.७५ टक्के आहे. अपेक्षित क्षेत्रापेक्षा अधिक ११० टक्के पेरणी नांदगाव तालुक्यात झाली. सर्वात कमी ७२ टक्के क्षेत्रात पेरणी अचलपूर तालुक्यात झाली आहे. यंदाचा खरीप पेरणी हंगामाचा कालावधी जवळजवळ संपत आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापूस पिकांचा पेरणी कालावधी संपला आहे. अशा स्थितीत धारणी तालुक्यात ४५ हजार ९४० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. चिखलदरा तालुक्यात २३ हजार ४३० हेक्टर, अमरावती तालुक्यात ५३ हजार १६५ हेक्टर, भातकुली तालुक्यात ४८ हजार ६४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६४ हजार १८७ हेक्टर, चांदूररेल्वे तालुक्यात ३९ हजार ५८९ हेक्टर, तिवसा तालुक्यात ४२ हजार ४९६ हेक्टर, मोर्शी तालुक्यात ५७ हजार ८७३ हेक्टर, वरूड तालुक्यात ४६ हजार ९११ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात ६७ हजार ४३२ हेक्टर, अंजनगाव तालुक्यात ४२ हजार ४२० हेक्टर, अचलपूर तालुक्यात ४१ हजार ६९२ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ५१ हजार ५७४ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५२ हजार ९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. चिखलदरा तालुक्यात अपेक्षित सरासरी क्षेत्राच्या १०३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. चांदूरबाजार तालुक्यात ८८ टक्के, अचलपूर ७२ टक्के, अंजनगाव ९५ टक्के, दर्यापूर १०८ टक्के, वरूड ९८ टक्के, मोर्शी ९५ टक्के, तिवसा ९७ टक्के, चांदूररेल्वे ९१ टक्के, नांदगाव खंडेश्वर ११० टक्के, भातकुली ९९ टक्के, अमरावती ९८ टक्के, चिखलदरा ७७ टक्के व धारणी तालुक्यात ८८ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक ३० हजार ९५० हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. शेतीमशागतीला वेग आला आहे.