शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

..तर शासन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखते कशाला? संस्था चालकांचा सवाल

By गणेश वासनिक | Updated: September 12, 2023 15:48 IST

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट द्या, ईमारत भाडे नियमित व्हावे

अमरावती : मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याच्या कारणास्तव महाविद्यालयीन संस्था चालक आणि शासन यांच्यात  शितयुद्ध पेटण्याची चिन्हे दिसून येत आहे. एकिकडे शासन शिष्यृवत्तीची देय रक्कम देत नाही आणि विद्यार्थ्यांची कागदपत्रे रोखली तर थेट कारवाईची तंबी दिली जाते. तर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखता कशाला? असा सवाल उपस्थित करून संस्था चालकांनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या खात्यात जमा करावे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार ईमारत भाडे, पायाभूत सुविधांचा खर्च द्यावा, अशी मागणी होत आहे.

मागास विद्यार्थ्यांची सन २०२१-२०२२, २०२२-२०२३ तर अनुसूचित जाती, व्हिजेएनटीच्या काही विद्यार्थ्यांची सन २०१६ ते २०२० या चार वर्षाची देखील शिष्यवृत्तीची देय रक्कम अद्यापही शासनाकडे प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेच्या येणाऱ्या शुल्कातूनच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. मात्र,शिष्यवृत्ती रक्कम देयकांचा पत्ता नाही. त्यामुळे खासगी महाविद्यालय चालविणे कठीण झाले आहे. ८ ते ९ महिन्यांपासून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन संचालकांना बॅंकेचे कर्ज घ्यावे लागले असून व्याजाचा भुर्दंड तो वेगळाच आहे. ईमारतींची डागडुजी, पायाभूत सुविधा पुरविताना होणारी दमछाक याचाही शासनाने विचार करावा, असा सवाल महाविद्यालयीन संचालकांनी उपस्थित केला आहे.

शासनाच्या शिष्यवृत्ती रक्कम देय कुठेही जात नाही. विद्यार्थी आणि महाविद्यालय असे संयुक्त लॉगीन आहे. परंतु, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहत असल्यामुळे पुढील ईतर प्रक्रिया थांबते. यात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित होते. प्रॉव्हिडंट फंड, ईएमआय आदी बाबींवर परिणाम होतो. त्यापेक्षा नियमित शिष्यवृत्ती रक्कम देय मिळणे हाच एक सुकर मार्ग आहे.

- डॉ. नितीन धांडे, अध्यक्ष, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAmravatiअमरावतीScholarshipशिष्यवृत्ती