शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

एसएमएस कंपनीचे दूषित पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:10 AM

नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीत जलशुद्धीकरण करणाऱ्या एसएमएस कंपनीचे केमिकलयुक्त पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये शिरले आहे. यामुळे नांदगाववासीयांचे आरोग्य ...

नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीत जलशुद्धीकरण करणाऱ्या एसएमएस कंपनीचे केमिकलयुक्त पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये शिरले आहे. यामुळे नांदगाववासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रवाहाने हे दूषित पाणी वाहत आता बोरनदी प्रकल्पात जात असून भविष्यात परिसरातील शेती आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

नजीकच्या आस्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या कालव्यात या दूषित आणि केमिकलयुक्त पाण्याचे थर साचलेले आहे. हे पाणी पावसाच्या प्रवाहाने जलस्रोतांमध्ये शिरत आहे. शिवाय नदीच्या कालव्यातून हे पाणी नव्याने बनलेल्या बोरनदी प्रकल्पातदेखील शिरत असल्यामुळे आजूबाजूची शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होणार आहे. एसएमएस कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतीत हे केमिकलयुक्त पाणी शिरल्याने येथील संत्राबागा व शेतातील उत्पादन कायमचे बंद झाले आहे. नुकतेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर बाधित झालेली शेती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. या कंपनीला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कंपनीने आजवर कोणतीच दाखल घेतलेली नसून, हे दूषित पाणी बघण्यासाठी नुकतेच ग्रामपंचायत सदस्य बाळू राऊत, छत्रपती पटके, गोलू नागापुरे व मोरेश्वर इंगळे यांनी मोका पाहणी करून कंपनीवर कारवाईची मागणी केली.