शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

सीताफळाचे भाव कडाडले, विक्रेते ग्राहक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 1:50 AM

अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल माळरानावर व चंद्रभागा, पूर्णा, शहानूर, सपन न बिच्छन नदीकाठावरील आणि नदीकाठच्या परिसरातील गावराण सीताफळाचा गोडवा काही औरच आहे. या सीताफळांना परराज्यासह स्वराज्यात अधिक मागणी आहे. उल्लेखनीय अशी नैसर्गिकरीत्या बनलेली सीताफळाची अनेक बने आहेत. या सीताफळांना स्वतंत्र ओळख आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सततच्या पावसाचा फटका; सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सीताफळाचा गोडवा न्याराच

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सततच्या पावसामुळे सीताफळांच्या बनातील फळांना पाहिजे तसा उत्तम दर्जाचा आकार आलाच नाही.त्यामुळे सीताफळाचे भाव चांगलेच कडाडले आहे. यात विक्रेत्यांसह ग्राहकही अडचणीत आले आहेत.अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल माळरानावर व चंद्रभागा, पूर्णा, शहानूर, सपन न बिच्छन नदीकाठावरील आणि नदीकाठच्या परिसरातील गावराण सीताफळाचा गोडवा काही औरच आहे. या सीताफळांना परराज्यासह स्वराज्यात अधिक मागणी आहे. उल्लेखनीय अशी नैसर्गिकरीत्या बनलेली सीताफळाची अनेक बने आहेत. या सीताफळांना स्वतंत्र ओळख आहे. यातून गरीब आदिवासींसह भूमिहीम शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सीताफळाचे व्यापारी ही नैसर्गिक सीताफळाची बनं, परिसर हर्रासात संबंधित विभागाकडून विकत घेतात. त्याची मालकी मिळवितात. यानंतर या सीताफळ बनांची राखन करून वेळोवेळी त्यातील फळांची तोड करतात. तोडलेल्या फळांची छाटणी करून ग्रेडींग करून फळांच्या डब्यात पॅक करतात. ही उत्तम दर्जाची, एक नंबरची फळ मोठमोठ्या शहरात विक्रीकरिता पाठवतात. सोबतच कॅरेटमध्ये भरूनही फळ बाजार विक्रीकरिता पाठविली जातात. परतवाडा-बैतूल रोडवरील बहिरम, काशी तलाव व फॉरेस्ट आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेतील सिताफळांच्या बनांचा, झाडांचा हर्रास यावर्षी व्यापाऱ्यांनी केवळ सव्वाचार लाखालाच घेतला. पावसामुळे या बनात मालच बनलेला नाही, असे त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खर्चासह बरोबरी होते की नाही याबाबत हे व्यापारी साशंक आहे. याच व्यापाºयांनी काही शेतकºयांचे सिताफळाचे बगीचेही विकत घेतले आहेत.अति पाऊसयावर्षी सुरूवातीला पाऊस लांबला; नंतर लागून पडलेला पाऊस ऑक्टोबरच्या शेवटापर्यंतही थांबायचे नाव घेत नाही. सततच्या पावसामुळे झाडांना सिताफळ लागलेत नाही. फळाअभावी वृक्ष विरळ झाले आहेत. यात भाव कडाडले असून शंभर ते एकशे वीस रूपये किलो दराने सिताफळ विकल्या जात आहेत. एका किलोत केवळ चार ते पाच फळ बसत आहेत. तर आदिवासींसह गोरगरीब शेतमजुरांकडून बाजारात विकायला आणल्या जाणाऱ्या सिताफळांच्या टोपल्यांची संख्याही रोडावली आहे.संशोधन केंद्रांची गरजसातपुडा पर्वताच्या पायथ्याशी डोंगर माळराणावर व नदीकाठी गावरान सीताफळे मधाळ आहेत. शेतकरीही सीताफळ लागवडीकडे वळला आहे. यात प्रक्रिया उद्योग, संशोधन केंद्र झाल्यास रोजगाराची दुहेरी संधी उपलब्ध होऊ शकेल.