चार जणांच्या उपस्थितीत होणार ‘शुभमंगल सावधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:01:13+5:30

लग्नाकरिता फक्त एकाच वाहनाला परवानगी देण्यात येईल. वाहन निर्जंतुक केलेले असणे आवश्यक आहे. लग्नास उपस्थित राहणाºया सर्वांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे. क्लस्टर आणि कंटेनमेंट झोनमधील रहिवासी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस लग्न समारंभासाठी उपस्थित राहता येणार नाही. लग्न समारंभ समारंभ पार पाडताना सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा.

'Shubhamangal Savdhan' to be held in the presence of four people | चार जणांच्या उपस्थितीत होणार ‘शुभमंगल सावधान’

चार जणांच्या उपस्थितीत होणार ‘शुभमंगल सावधान’

ठळक मुद्देप्रशासनाने काढले आदेश : घ्यावी लागणार परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/ चिखलदरा : कोरोना आजाराचा फैलाव पाहता, लग्न समारंभासाठी आता प्रशासनाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. विवाहाकरिता वर व वधू वगळता केवळ चार व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे
हिंदू रीतिरिवाजानुसार गाजावाजा करीत, लग्न समारंभ थाटात साजरा करण्याची पद्धत आहे. परंतु, कोरोनाकाळात ही पद्धत काही दिवस मोडीत काढत लग्न साध्या व घरगुती पद्धतीने करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी जाहीरपणे नागरिकांना त्याबाबत सूचित केले. शासनाच्या या आदेशाने हार-तुरे, बँड बाजा, जेवणावळी, डीजे, बुफे, फटाक्यांची आतषबाजी आदी सर्व बाबींना बंदी घालण्यात आली आहे.

या आहेत अटी
लग्नाकरिता फक्त एकाच वाहनाला परवानगी देण्यात येईल. वाहन निर्जंतुक केलेले असणे आवश्यक आहे. लग्नास उपस्थित राहणाºया सर्वांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे. क्लस्टर आणि कंटेनमेंट झोनमधील रहिवासी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस लग्न समारंभासाठी उपस्थित राहता येणार नाही. लग्न समारंभ समारंभ पार पाडताना सर्वांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे. लग्न समारंभात उपस्थित राहणाºया सर्वांना आरोग्य सेतु अ‍ॅप वापरणे बंधनकारक राहणार आहे.

ही लागणार कागदपत्रे
लग्नपत्रिका (असल्यास), वर-वधू यांची टीसी व आधार कार्ड, ज्या चार व्यक्ती उपस्थित राहतील, त्यांची नावे व आधार कार्ड, वापरले जाणारे वाहनाचे कागदपत्र, वाहनचालकाचे नाव, आधार कार्ड व वाहनचालक परवाना तसेच सर्वांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पूर्तता करून तहसील कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. लग्न समारंभासाठी शासनाने दिलेल्या नियम-अटींचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.
- मदन जाधव
तहसीलदार, अचलपूर

Web Title: 'Shubhamangal Savdhan' to be held in the presence of four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न