शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

१ लाखावर नागरिकांची तहान भागविली जाताहेत टॅंकर-विहिरीवर

By जितेंद्र दखने | Updated: June 17, 2023 16:55 IST

पाणी समस्या : मेळघाटासह गैरआदिवासी भागातील ८८ गावात टंचाई

अमरावती :मेळघाटातील चिखलदरा,धारणी सह गैरआदिवासी भागातील ८८ गावात पिण्याच्या पाण्याचीटंचाई जाणवू लागली आहे. जून महिन्यातही या गावामधील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ११ गावात १४ टॅंकरने तर ७७ गावांमध्ये ८४ विंधन विहीर व खासगी विहीरव्दारे १ लाख ०९ हजार ८०२ नागरिकांची तहान भागविली जात आहे. यामध्ये १० हजार १२९ नागरिकांना १४ टॅकरव्दारे तर ७७ गावातील १ लाखावर नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील अनेक गाव आणि वाड्या वस्त्यांवर शासकीय टँकर पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात शासकीय आणि खाजगी टँकरचा समावेश आहे. ८८ गावात पाणी टंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा केला जात आहे. यात चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावात तर चिखलदरा तालुक्यामधील १० गावात १४ टॅक़रने पाणी पुरवठा केला जात आहे. तर ११ तालुक्यातील २६ गावात विंधन विहीर तर ५८ खाजगी विहीरीव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.या गावात टॅंकरने पाणी पुरवठा

चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा मधील  आकी, मोथा, खोंगडा, रायपूर, साेमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझिरा, गौलखेडा बाजार आदी ११ गावात टॅकरव्दारे तहान भागविली जात आहे.तालुकानिहाय विहिर अधिग्रहाणाचे गावे 

अमरावती ०९, नांदगाव खंडेश्वर १५,भातकुली ०१, तिवसा ०४, मोर्शी ०८, वरूड ०४, चांदूर रेल्वे १२, अचलपूर ०३, चिखलदरा १७, धारणी ०३, धामनगांव रेल्वे ०१ अशा १४ पैकी ११ तालुक्यातील ७७ गावात विहीर अधिग्रहणाव्दारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील मेळघाटसह ११ तालुक्यातील जवळपास ८८गावात पाणी टंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने १४ टॅकर व ८४ विहीरचे अधिग्रहन केलेले आहे.या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांना सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पेक्षा यंदा टॅकरची संख्या बरीच घटली आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातMelghatमेळघाटAmravatiअमरावती